शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्माची मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सुरु - तारा भवाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:21 IST

वारी भांडवलशाही होत असल्याची टीका

सांगली : महाराष्ट्रातील वारकरी संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. अंधश्रद्धेतून गरिबांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी झटले. वारकरी चळवळीने सर्व जाती-धर्मांची मोट बांधली. ही मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पुरोगामी चळवळीने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असे प्रतिपादन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.सांगलीत गुरुवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ व ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमाला अंनिसचे हमीद दाभोलकर, संत साहित्यांचे अभ्यासक सचिन परब, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सुभाष पाटील, साहित्यिक डॉ. अनिल मडके, अंनिसचे राहुल थोरात आदी उपस्थित होते.डॉ. भवाळकर म्हणाल्या, पूर्वी ग्रामसंस्कृती जातीभेदाने बुजबुजली होती. व्यक्तीच्या जातीनुसार त्याची कामे ठरायची. अशा श्रमकऱ्यांचे प्रतीक म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल होता. महाराष्ट्रातील वारकरी संत हे एकाच वेळी उच्चवर्णीयांच्या अहंकाराला आव्हान देत लढत होते. त्याचबरोबर गरीब लोकांतील अंधश्रद्धेविरुद्धही लढत होते. संत साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. उच्चवर्णीय असूनही एकनाथांनी भारुडातून महिलांच्या समस्या मांडल्या.संत साहित्याने शिवरायांनाही प्रेरणा दिली. या साहित्यानेच मराठी भाषा जिवंत ठेवली. परब म्हणाले, संत साहित्याने समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर थेट प्रहार केले. असे धाडस आज कोणीही करणार नाही. हमीद दाभोलकर म्हणाले, अंनिसची वाटचालही संत परंपरेला अनुसरूनच व्हावी, अशी भूमिका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडली होती. वारकरी परंपरेने देव नाकारणाऱ्यांनाही नाकारले नाही. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, प्रकाशक अरविंद पाटकर आदी उपस्थित होते. राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

वारीमार्गावर अन्नछत्रे कशासाठी?डॉ. भवाळकर म्हणाल्या, वारकरी परंपरा कोणावरही अवलंबून नाही. काहीही फुकट घ्यायचे नाही, अशी तिची मानसिकता आहे. तरीही, सध्या वारीमार्गावर अन्नछत्रे दिसतात. ती वारकरी परंपरेत बसत नाहीत. वारीमार्गावर मांसबंदी, व्यसनांचा प्रचार, अन्नछत्रे यांची उभारणी विशिष्ट हेतूने सुरू आहे. आजची वारकरी परंपरा भांडवलशाहीकडे जाऊ लागली आहे.