शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:08 IST

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव ...

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले की, महाराष्टÑातील जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने मिळत आहे. बुथनिहाय तयारी करण्यात आल्यानेच हे यश आपल्या पदरी पडले आहे. आपल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दुर्योधन आणि दु:शासन होते. त्याचप्रमाणे स्वबळाचा नारा देणारा शिवसेना हा पक्षदेखील होता. त्यामुळे कोणीही आपल्यासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा पराभवच होतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या हातात सत्तासूत्रे आल्याने आता शहराचा हमखास विकास होईल.मराठा आरक्षणासंदर्भात हाळवणकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांच्या शिक्षण संस्था, कारखाने, तसेच अन्य व्यवसाय आहेत. परंतु त्यांनी मराठा समाजातील लोकांना आजपर्यंत काहीही दिलेले नाही. याचा संताप आंदोलकांच्या मनात आहे. आरक्षण देण्यास फडणवीस सरकार बांधील आहे. मध्यंतरी एक मोर्चा मुंबईत सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. त्यानंतर सरकारने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला.मराठा समाज जागरुक आहे. कॉँग्रेस सरकारने २०१४ मध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. साहजिकच फडणवीस सरकारने त्या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात केले व नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, एवढेच नव्हे, तर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील मार्ग काढला जाईल, असे सांगितले.देशमुख म्हणाले की, महापालिका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याच पध्दतीने ग्रामीण भागातील विस्तारक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. महापालिका ताब्यात आल्याने खºयाअर्थाने जिल्हा भाजपमय झाला आहे. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने याची तयारी सुरु झाली आहे.शिवसेना स्वतंत्र : नावालासुद्धा नाहीमित्रपक्ष म्हणविणाºया शिवसेनेनेसुद्धा महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तब्बल ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचीही डाळ शिजली नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.तंत्रज्ञानाशी जवळीक करा!भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित असला पाहिजे. पंतप्रधानांनी ‘नमो अ‍ॅप’ विकसित केले आहे. ते कितीजणांकडे आहे? असा प्रश्न हाळवणकर यांनी विचारताच, सभागृहातील फारच कमी हात वर आले. त्यामुळे हाळवणकर यांनी मेळाव्यातच सर्वांकडून अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.आज विजयी मेळावासांगली : नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीत ८ आॅगस्ट रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी, रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना एकत्रित येता आले नव्हते. त्यामुळेच मेळाव्याचे आयोजन केले आहे.