शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:08 IST

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव ...

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले की, महाराष्टÑातील जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने मिळत आहे. बुथनिहाय तयारी करण्यात आल्यानेच हे यश आपल्या पदरी पडले आहे. आपल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दुर्योधन आणि दु:शासन होते. त्याचप्रमाणे स्वबळाचा नारा देणारा शिवसेना हा पक्षदेखील होता. त्यामुळे कोणीही आपल्यासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा पराभवच होतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या हातात सत्तासूत्रे आल्याने आता शहराचा हमखास विकास होईल.मराठा आरक्षणासंदर्भात हाळवणकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांच्या शिक्षण संस्था, कारखाने, तसेच अन्य व्यवसाय आहेत. परंतु त्यांनी मराठा समाजातील लोकांना आजपर्यंत काहीही दिलेले नाही. याचा संताप आंदोलकांच्या मनात आहे. आरक्षण देण्यास फडणवीस सरकार बांधील आहे. मध्यंतरी एक मोर्चा मुंबईत सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. त्यानंतर सरकारने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला.मराठा समाज जागरुक आहे. कॉँग्रेस सरकारने २०१४ मध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. साहजिकच फडणवीस सरकारने त्या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात केले व नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, एवढेच नव्हे, तर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील मार्ग काढला जाईल, असे सांगितले.देशमुख म्हणाले की, महापालिका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याच पध्दतीने ग्रामीण भागातील विस्तारक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. महापालिका ताब्यात आल्याने खºयाअर्थाने जिल्हा भाजपमय झाला आहे. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने याची तयारी सुरु झाली आहे.शिवसेना स्वतंत्र : नावालासुद्धा नाहीमित्रपक्ष म्हणविणाºया शिवसेनेनेसुद्धा महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तब्बल ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचीही डाळ शिजली नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.तंत्रज्ञानाशी जवळीक करा!भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित असला पाहिजे. पंतप्रधानांनी ‘नमो अ‍ॅप’ विकसित केले आहे. ते कितीजणांकडे आहे? असा प्रश्न हाळवणकर यांनी विचारताच, सभागृहातील फारच कमी हात वर आले. त्यामुळे हाळवणकर यांनी मेळाव्यातच सर्वांकडून अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.आज विजयी मेळावासांगली : नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीत ८ आॅगस्ट रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी, रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना एकत्रित येता आले नव्हते. त्यामुळेच मेळाव्याचे आयोजन केले आहे.