शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
2
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
3
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
4
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
5
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
7
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
9
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
10
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
11
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
12
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
13
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
14
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
15
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
16
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
17
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
18
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
19
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
20
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ

दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:08 IST

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव ...

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले की, महाराष्टÑातील जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने मिळत आहे. बुथनिहाय तयारी करण्यात आल्यानेच हे यश आपल्या पदरी पडले आहे. आपल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दुर्योधन आणि दु:शासन होते. त्याचप्रमाणे स्वबळाचा नारा देणारा शिवसेना हा पक्षदेखील होता. त्यामुळे कोणीही आपल्यासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा पराभवच होतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या हातात सत्तासूत्रे आल्याने आता शहराचा हमखास विकास होईल.मराठा आरक्षणासंदर्भात हाळवणकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांच्या शिक्षण संस्था, कारखाने, तसेच अन्य व्यवसाय आहेत. परंतु त्यांनी मराठा समाजातील लोकांना आजपर्यंत काहीही दिलेले नाही. याचा संताप आंदोलकांच्या मनात आहे. आरक्षण देण्यास फडणवीस सरकार बांधील आहे. मध्यंतरी एक मोर्चा मुंबईत सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. त्यानंतर सरकारने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला.मराठा समाज जागरुक आहे. कॉँग्रेस सरकारने २०१४ मध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. साहजिकच फडणवीस सरकारने त्या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात केले व नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, एवढेच नव्हे, तर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील मार्ग काढला जाईल, असे सांगितले.देशमुख म्हणाले की, महापालिका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याच पध्दतीने ग्रामीण भागातील विस्तारक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. महापालिका ताब्यात आल्याने खºयाअर्थाने जिल्हा भाजपमय झाला आहे. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने याची तयारी सुरु झाली आहे.शिवसेना स्वतंत्र : नावालासुद्धा नाहीमित्रपक्ष म्हणविणाºया शिवसेनेनेसुद्धा महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तब्बल ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचीही डाळ शिजली नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.तंत्रज्ञानाशी जवळीक करा!भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित असला पाहिजे. पंतप्रधानांनी ‘नमो अ‍ॅप’ विकसित केले आहे. ते कितीजणांकडे आहे? असा प्रश्न हाळवणकर यांनी विचारताच, सभागृहातील फारच कमी हात वर आले. त्यामुळे हाळवणकर यांनी मेळाव्यातच सर्वांकडून अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.आज विजयी मेळावासांगली : नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीत ८ आॅगस्ट रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी, रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना एकत्रित येता आले नव्हते. त्यामुळेच मेळाव्याचे आयोजन केले आहे.