शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Sangli: विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी महायुतीत गटबाजी, खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:12 IST

घटक पक्षातील नेत्यांनी फिरविली पाठ

दिलीप मोहितेविटा : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे वगळता महायुतीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खानापूर मतदारसंघात महायुतीतच गटबाजी असल्याचे दिसून आले.

विटा येथे मंगळवारी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. परंतु, महायुतीतील मित्र पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विटा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. मात्र, या मेळाव्यात विरोधी महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

मतदारसंघावरील दावेदारीवरून वादखानापूर मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील, भाजपमधून माजी आमदार राजेंद्र देशमुख व ब्रम्हानंद पडळकर हे प्रमुख दावेदार आहेत. प्रत्येक इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही दौरा अचानक रद्द झाल्याने या दावेदारीला बळ मिळाले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून व्हिडीओच्या माध्यमातून पाच मिनिटे मेळाव्याला उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले. तरीही त्यांच्या पक्षाचे नेते व पदाधिकारीही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

“खानापूर मतदारसंघातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांना बोलाविणे आवश्यक होते. तरीही संयोजकांनी निमंत्रण दिले नाही. त्यामुळे न बोलाविता या कार्यक्रमाला जायला आम्ही 'बिन बुलाया मेहमान' नाही. - राजेंद्र देशमुख, माजी आमदार, भाजप 

टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवसेनेने शेतकरी मेळावा घेतला. परंतु या कार्यक्रमाला महायुतीतील घटक पक्षाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला शेतकरी मेळावा, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड मेळावा केला. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. - ॲड. वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)

टॅग्स :Sangliसांगलीkhanapur-acखानापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती