शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी महायुतीत गटबाजी, खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:12 IST

घटक पक्षातील नेत्यांनी फिरविली पाठ

दिलीप मोहितेविटा : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे वगळता महायुतीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खानापूर मतदारसंघात महायुतीतच गटबाजी असल्याचे दिसून आले.

विटा येथे मंगळवारी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. परंतु, महायुतीतील मित्र पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विटा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. मात्र, या मेळाव्यात विरोधी महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

मतदारसंघावरील दावेदारीवरून वादखानापूर मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील, भाजपमधून माजी आमदार राजेंद्र देशमुख व ब्रम्हानंद पडळकर हे प्रमुख दावेदार आहेत. प्रत्येक इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही दौरा अचानक रद्द झाल्याने या दावेदारीला बळ मिळाले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून व्हिडीओच्या माध्यमातून पाच मिनिटे मेळाव्याला उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले. तरीही त्यांच्या पक्षाचे नेते व पदाधिकारीही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

“खानापूर मतदारसंघातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांना बोलाविणे आवश्यक होते. तरीही संयोजकांनी निमंत्रण दिले नाही. त्यामुळे न बोलाविता या कार्यक्रमाला जायला आम्ही 'बिन बुलाया मेहमान' नाही. - राजेंद्र देशमुख, माजी आमदार, भाजप 

टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवसेनेने शेतकरी मेळावा घेतला. परंतु या कार्यक्रमाला महायुतीतील घटक पक्षाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला शेतकरी मेळावा, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड मेळावा केला. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. - ॲड. वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)

टॅग्स :Sangliसांगलीkhanapur-acखानापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती