शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Sangli: विट्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी महायुतीत गटबाजी, खानापूर मतदारसंघात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:12 IST

घटक पक्षातील नेत्यांनी फिरविली पाठ

दिलीप मोहितेविटा : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाला. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे वगळता महायुतीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच खानापूर मतदारसंघात महायुतीतच गटबाजी असल्याचे दिसून आले.

विटा येथे मंगळवारी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल व सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली. परंतु, महायुतीतील मित्र पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विटा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मेळाव्याकडे पाठ फिरविली. मात्र, या मेळाव्यात विरोधी महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

मतदारसंघावरील दावेदारीवरून वादखानापूर मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील, भाजपमधून माजी आमदार राजेंद्र देशमुख व ब्रम्हानंद पडळकर हे प्रमुख दावेदार आहेत. प्रत्येक इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही दौरा अचानक रद्द झाल्याने या दावेदारीला बळ मिळाले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून व्हिडीओच्या माध्यमातून पाच मिनिटे मेळाव्याला उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले. तरीही त्यांच्या पक्षाचे नेते व पदाधिकारीही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

“खानापूर मतदारसंघातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांना बोलाविणे आवश्यक होते. तरीही संयोजकांनी निमंत्रण दिले नाही. त्यामुळे न बोलाविता या कार्यक्रमाला जायला आम्ही 'बिन बुलाया मेहमान' नाही. - राजेंद्र देशमुख, माजी आमदार, भाजप 

टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवसेनेने शेतकरी मेळावा घेतला. परंतु या कार्यक्रमाला महायुतीतील घटक पक्षाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला शेतकरी मेळावा, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड मेळावा केला. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. - ॲड. वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)

टॅग्स :Sangliसांगलीkhanapur-acखानापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती