शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

By अविनाश कोळी | Updated: September 21, 2022 19:11 IST

कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

सांगली : नवरात्रोत्सवात गेल्या ३७ वर्षांपासून शिवप्रतिष्ठानमार्फत सांगलीत दुर्गामाता दौड काढण्यात येते. कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवप्रतिष्ठान व शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या दोन्ही संघटनांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघटना दौडीत एकत्र येणार की वेगवेगळ्या दौडी होणार हा मुद्दा चर्चेत आला आहे.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने सांगलीतील दौडीत सहभागी होण्याचा निर्धार केला आहे, मात्र संघटना वेगवेगळ्या असल्याने जुन्या दौडीत त्यांना समाविष्ट केले जाणार की त्यांना बाजुला केले जाणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. संभाजीराव भिडे यांनी शिवप्रतिष्ठानची स्थापना केली आहे. त्यांच्या संघटनेतून फुटून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची स्थापना केली आहे. दोन्ही संघटनांकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.नवी संघटना झाल्यापासून कोरोनामुळे दौडीच झाल्या नव्हत्या. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला नाही. आता विभाजनानंतर प्रथमच दौड होत असल्याने व दोन्ही संघटना दौडीबाबत आग्रही असल्याने वादाचा प्रसंग निर्माण होण्याची चर्चा सुरु झाली आहे.

अशी असते दौड...शिवप्रतिष्ठानच्यावतीने १९८५ पासून सांगलीत दौड होत आहे. नऊ दिवस पहाटे ५ वाजता सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दौड सुरु होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन दौड माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ येते. याठिकाणी दर्शन घेऊन ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होऊन सांगता करण्यात येते.

वादाचा मुद्दा काय आहे?शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संस्थापक नितीन चौगुले यांनी सांगलीतील दौडीत सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. स्वतंत्र दौडीचा मुद्दा त्यांनी मांडला नाही. दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व संस्थापक संभाजीराव भिडे ‘युवा’च्या कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेणार का, असा प्रश्न आहे. त्यांनी सहभागी करुन घेतले नाही, तर वेगळी दौडही निघण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीNavratriनवरात्री