शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजनांच्या पाणीपट्टी वसुलीवर टग्यांचाच डल्ला

By admin | Updated: May 11, 2017 23:25 IST

सिंचन योजनांच्या पाणीपट्टी वसुलीवर टग्यांचाच डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना काही प्रमाणात चालू झाल्या असून त्यांचे पाणी वाटप आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा उभी करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गावटग्यांनी पैसे गोळा केल्यानंतर ते नेण्यासाठी अधिकारी जाईपर्यंत त्यावर काही गावटगे डल्ला मारत आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सध्या तिन्ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आहे. उर्वरित क्षेत्राला अद्यापही पाणी मिळालेले नाही. केवळ जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. शासनाने ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांवर चार हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. पण, या योजनांचे पाणी वाटपासाठी लागणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष आहे. यामुळेच दुष्काळातही ओढ्या-नाल्यांतून पाणी सोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी कर्नाटकला मंगसुळीपर्यंत जाते. जत, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्षे दुष्काळात होरपळत आहेत. येथील शेतकरी द्राक्ष, डाळिंब बागा जगविण्यासाठी हजारो रूपये टँकरवर खर्च करतात. त्यांना पाच ते सात हजाराची पाणीपट्टी निश्चितच जास्त नाही. ते पैसेही भरण्यासाठी तयार आहेत. पण, ते पैसे व्यवस्थित वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कुठलीही सक्षम यंत्रणाच कार्यरत नाही. पाणीपट्टी वसुलीसाठी गावटग्यांवरच भिस्त आहे. नियोजनशून्य कारभार : संपतराव पवारयात्रेची वर्गणी गोळा केल्याप्रमाणे सिंचन योजनांची पाणीपट्टी वसूल केली जाते. पाणीही वाट्टेल त्यापध्दतीने सोडून दिले जात असून, यामध्ये जलसंपदा विभागाचे कोणतेही नियोजन नाही. योजना चालू होऊन दहा ते बारा वर्षे झाली आहेत. तरीही पोटकालव्याचा पत्ताच नाही. शेतकऱ्यांना योग्य पध्दतीने पाणी दिले पाहिजे. योग्य पध्दतीनेच म्हणजे पाटबंधारे अथवा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रितसर पावती देऊनच शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल केली पाहिजे. पाणीपट्टी वसुली शासकीय यंत्रणेमार्फतच व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी चळवळीचे नेते संपतराव पवार यांनी केली.पैसे भरल्याची पावतीच मिळत नाही : धायगुडे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात आमचे गाव येत आहे. वर्षातून दोनवेळा लोकच पैसे गोळा करून अधिकाऱ्यांकडे देतात. पैसे भरल्यानंतर पावतीही मिळत नाही. यामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांमार्फत पावती देऊनच पैसे वसूल करावेत. शंभर टक्के शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत, अशी प्रतिक्रिया आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील शेतकरी प्रमोद धायगुडे यांनी दिली.