शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पाण्याअभावी द्राक्षबागांच्या खरड छाटण्या रखडल्या -: जत तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:47 IST

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध

ठळक मुद्दे अवकाळी पावसाची दडी; आर्थिक फटका

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रखडली आहेत. परिणामी यावर्षी द्राक्ष उत्पादनात घट होणार असून बागायतदार आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड अशा फोंड्या माळरानावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधून द्राक्षबागा जगविण्याची धडपड शेतकरी करत आहे. बागांची खरड छाटणी घेऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही, तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही.

मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकरी द्राक्ष बागांना टँकरने पाणी घालत आहेत. परंतु टँकर भरण्याला सुद्धा पाणी मिळेनासे झाले आहे. त्याचेही दर वाढल्याने टँकरचे पाणी परवडत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.मजुरांना रोजगार : नाहीद्राक्षबागेसाठी दरवर्षी मे महिन्यात छाटणी करणे, खुडा काढणे, पेस्ट लावणे, डॉरमिक्स लावणे, बेदाणा शेडला टाकणे, बेदाणा झाडणे व इतर कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मजुरांना रोजगाराची संधी मिळते. मजुरीही जास्त मिळते. पण यावर्षी पाण्याअभावी खरड छाटणी झाली नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार नाही. 

पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही. पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- ओग्याप्पा तोदलबागी, भिवर्गीजत पूर्व भागातील द्राक्षबागांची पाण्याअभावी खरड छाटणी झालेली नाही. फक्त खोड आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी