शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या स्फोटात आई-वडिलांचा मृत्यू, मुलं झाली पोरकी; सांगलीतील सोनसळमधील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:25 IST

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच.

अशोक डोंबाळेसांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथे चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाले. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम (वय ३६) यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसात वडील अंकुश यांचेही निधन झाले. उपचार घेताना बहिण-भावंडांना त्याची कल्पनाही नव्हती. घरी परतल्यानंतर भकास निराधारपणाचे आयुष्य त्यांची प्रतीक्षा करीत होते. जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे.पोरके झालेल्यांमध्ये मुलगी सोनाली (वय १८), मुलगा अभिराज (वय १५) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांची करुण कहाणी कल्पनेपलिकडची आहे. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे हसण्या-खेळण्याच्या वयातच सोनाली आणि अभिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला. सोनसळमध्ये चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नीसह त्यांची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. पती-पत्नीचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले उपचारानंतर बरी झाली; पण, आजही त्यांच्या अंगावर आणि मनावर झालेल्या जखमा आणि वेदना तितक्याच गंभीर आहेत. जखमेच्या वेदनांपेक्षाही आई-बाबांचे छत्र हरपल्याची आणि त्यानंतर संघर्षात जगत असलेल्या दोघा मुलांची वेदना हृदय पिळवटून टाकणारी आहे.दोघांचे वडील अंकुश हे त्यांच्या कुटुंबात एकुलते वारस होते. आजीचे निधन झाले असून आजोबा हयात आहेत. अंकुश हयात असताना त्यांचे वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळे ते कऱ्हाडला मुक्कामी आहेत. सोनाली आणि अभिराज यांच्या आजोळच्या लोकांनी रुग्णालयाचा खर्च केला. अंकुशमुळे आपली मुलगी गेली, म्हणून तेही पुन्हा सोनसळला फिरकलेच नाहीत, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे ज्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला, तेथेच आई-बाबांचे छत्र हरपलेली निराधार दोन भावंडे स्फोटाच्या जखमा घेऊन विव्हळत एक एक रात्र ढकलत आहेत.

शेजारी धावले, तरीही प्रश्न कायमनातलगांनी झिडकारले तरी शेजारी मात्र हिंमत हरले नाहीत. तेच या निराधार भावंडांची काळजी घेत आहेत. सोनाली बारावीत आणि अभिराज नववीमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या त्यांचे शिक्षण थांबले आहे. आरोग्याचा प्रश्न अजून संपलेला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा असल्याने त्यांना दानशुरांच्या मदतीची आणि मायेची साथ हवी आहे.

अजूनही माणुसकी जिवंत आहेसोनाली आणि अभिराजच्या दु:खाची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांच्यापर्यंत पोहोचली. लगेच त्यांनी या मुलांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न चालू केले आहेत. या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. पण, फारशी कुणाची मदत होत नसल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग