शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

सिलिंडरच्या स्फोटात आई-वडिलांचा मृत्यू, मुलं झाली पोरकी; सांगलीतील सोनसळमधील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:25 IST

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच.

अशोक डोंबाळेसांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथे चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाले. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम (वय ३६) यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसात वडील अंकुश यांचेही निधन झाले. उपचार घेताना बहिण-भावंडांना त्याची कल्पनाही नव्हती. घरी परतल्यानंतर भकास निराधारपणाचे आयुष्य त्यांची प्रतीक्षा करीत होते. जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवित पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे.पोरके झालेल्यांमध्ये मुलगी सोनाली (वय १८), मुलगा अभिराज (वय १५) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांची करुण कहाणी कल्पनेपलिकडची आहे. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे हसण्या-खेळण्याच्या वयातच सोनाली आणि अभिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला. सोनसळमध्ये चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नीसह त्यांची दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. पती-पत्नीचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले उपचारानंतर बरी झाली; पण, आजही त्यांच्या अंगावर आणि मनावर झालेल्या जखमा आणि वेदना तितक्याच गंभीर आहेत. जखमेच्या वेदनांपेक्षाही आई-बाबांचे छत्र हरपल्याची आणि त्यानंतर संघर्षात जगत असलेल्या दोघा मुलांची वेदना हृदय पिळवटून टाकणारी आहे.दोघांचे वडील अंकुश हे त्यांच्या कुटुंबात एकुलते वारस होते. आजीचे निधन झाले असून आजोबा हयात आहेत. अंकुश हयात असताना त्यांचे वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळे ते कऱ्हाडला मुक्कामी आहेत. सोनाली आणि अभिराज यांच्या आजोळच्या लोकांनी रुग्णालयाचा खर्च केला. अंकुशमुळे आपली मुलगी गेली, म्हणून तेही पुन्हा सोनसळला फिरकलेच नाहीत, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे ज्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला, तेथेच आई-बाबांचे छत्र हरपलेली निराधार दोन भावंडे स्फोटाच्या जखमा घेऊन विव्हळत एक एक रात्र ढकलत आहेत.

शेजारी धावले, तरीही प्रश्न कायमनातलगांनी झिडकारले तरी शेजारी मात्र हिंमत हरले नाहीत. तेच या निराधार भावंडांची काळजी घेत आहेत. सोनाली बारावीत आणि अभिराज नववीमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या त्यांचे शिक्षण थांबले आहे. आरोग्याचा प्रश्न अजून संपलेला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा असल्याने त्यांना दानशुरांच्या मदतीची आणि मायेची साथ हवी आहे.

अजूनही माणुसकी जिवंत आहेसोनाली आणि अभिराजच्या दु:खाची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांच्यापर्यंत पोहोचली. लगेच त्यांनी या मुलांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न चालू केले आहेत. या मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. पण, फारशी कुणाची मदत होत नसल्याची खंत कदम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग