शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Sangli: वाकुर्डे कालव्याच्या गळतीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

By संतोष भिसे | Updated: May 17, 2024 17:19 IST

५०० एकर शेती नापिक

विकास शहाशिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या १० किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी उताराच्या बाजूची सुमारे ५०० एकर शेतजमीन नापीक झाली आहे. याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले होते. २०१७ पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही. पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे शेतकरी गेल्या ७ वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू केला आहे; मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कालव्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची गळती होऊन कालव्याशेजारी उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. धूळवाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणात शिवाजी शेटके, दगडू शेटके, वसंत शेटके, नाथाभाऊ शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, कृष्णा शेटके, हणमंत माने, भाऊसाहेब जाधव, गोरख शेटके, बाळू शेटके, प्रकाश शेटके, हनुमंत माने, रघुनाथ सावंत, रंगराव पाटील, श्रीरंग सावंत, लक्ष्मण शेटके, साधू शेटके, राजाराम पडवळ आदी सहभागी झाले आहेत. जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता कमलाकर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर, उपअभियंता गुरू महाजन या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

अशा आहेत मागण्याकालव्याचा भराव शेतकऱ्यांच्या हद्दीत पडला असल्यास त्या क्षेत्राची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ज्यांच्या चुकीमुळे भराव पडला, त्यांच्या पगारातून, ठेकेदाराच्या संपत्तीतून भरपाई वसूल करून द्यावी. तसा अहवाल महिन्याभरात मिळावा. कालव्याचे दगडी बांधकाम, काँक्रीट अस्तरीकरण, लायनिंग, बेडकाँक्रीट यामध्ये ५० मायक्रॉन २२० पॉलिथिन पेपर वापरलाच नाही, त्याचे पंचनामे व्हावेत. लोखंडी गेट, कालव्यात चुकीच्या घातलेल्या सिमेंट पाईप आणि त्यावरील भराव व रस्ता यांचाही दर्जा चांगला नाही. ठेकेदार व संबंधित सर्व अभियंते, गुणवत्ता नियंत्रक यांचे संगनमत आहे. त्या सर्वांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करावी. अवैध मार्गांनी मिळवलेली संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करावी. ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीagitationआंदोलन