शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वाकुर्डे कालव्याच्या गळतीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

By संतोष भिसे | Updated: May 17, 2024 17:19 IST

५०० एकर शेती नापिक

विकास शहाशिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या १० किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी उताराच्या बाजूची सुमारे ५०० एकर शेतजमीन नापीक झाली आहे. याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले होते. २०१७ पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही. पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे शेतकरी गेल्या ७ वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू केला आहे; मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कालव्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची गळती होऊन कालव्याशेजारी उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. धूळवाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणात शिवाजी शेटके, दगडू शेटके, वसंत शेटके, नाथाभाऊ शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, कृष्णा शेटके, हणमंत माने, भाऊसाहेब जाधव, गोरख शेटके, बाळू शेटके, प्रकाश शेटके, हनुमंत माने, रघुनाथ सावंत, रंगराव पाटील, श्रीरंग सावंत, लक्ष्मण शेटके, साधू शेटके, राजाराम पडवळ आदी सहभागी झाले आहेत. जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता कमलाकर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर, उपअभियंता गुरू महाजन या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

अशा आहेत मागण्याकालव्याचा भराव शेतकऱ्यांच्या हद्दीत पडला असल्यास त्या क्षेत्राची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ज्यांच्या चुकीमुळे भराव पडला, त्यांच्या पगारातून, ठेकेदाराच्या संपत्तीतून भरपाई वसूल करून द्यावी. तसा अहवाल महिन्याभरात मिळावा. कालव्याचे दगडी बांधकाम, काँक्रीट अस्तरीकरण, लायनिंग, बेडकाँक्रीट यामध्ये ५० मायक्रॉन २२० पॉलिथिन पेपर वापरलाच नाही, त्याचे पंचनामे व्हावेत. लोखंडी गेट, कालव्यात चुकीच्या घातलेल्या सिमेंट पाईप आणि त्यावरील भराव व रस्ता यांचाही दर्जा चांगला नाही. ठेकेदार व संबंधित सर्व अभियंते, गुणवत्ता नियंत्रक यांचे संगनमत आहे. त्या सर्वांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करावी. अवैध मार्गांनी मिळवलेली संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करावी. ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीagitationआंदोलन