शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

पाकिस्तानच्या साखरेमुळे जिल्ह्यात कारखाने संकटात-क्विंटलला दोनशे रुपयांनी दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:45 AM

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया ...

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

 अशोक डोंबाळे ।सांगली : देशात मुबलक साखर असतानाही पाकिस्तानमधून ३० हजार क्विंटल साखर आयात करुन सरकारने सहकारी साखर कारखानदारीचे कंबरडे मोडले आहे. मागील आठवड्यापेक्षा क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांनी दराची घसरण होऊन मंगळवारी साखरेचे दर २४०० ते २५५० रुपयांपर्यंत आले आहेत. यामुळे कारखानदारांबरोबरच शेतकºयांचेही नुकसान झाले आहे. कारखानदारांनी शेतकºयांची दुसºया हप्त्याची सर्वच बिले थांबविल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षाचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्विंटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. या परिस्थितीमध्येच कारखानदारांचा आर्थिक अडचणीतून प्रवास चालू होता. राज्य आणि जिल्हा बँकांनी साखरेचे मूल्यांकनही कमी केल्यामुळे ऊस उत्पादकांचे पैसेही काही कारखान्यांना देता आले नाहीत.

जिल्ह्यातील चार ते पाच साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या शेवटी आलेल्या उसाची बिलेही शेतकºयांना दिली नाहीत. दुसºया हप्त्याची बिले तर सर्वच कारखान्यांनी दिली नाहीत. कारखानदारांच्या आर्थिक कोंडीचा शेतकºयांनाच फटका बसला आहे. शासनाने याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात २०१७-१८ च्या गळीत हंगामामध्ये विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पूर्वीची शिल्लक साखर असताना, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातून ३० हजार क्विंटल साखर आयात केली. साखर आयात केल्याची चर्चा चालू असतानाच महाराष्ट्रातील साखरेचे दर गडगडले आहेत.

मागील आठवड्यात लहान साखरेचे दर प्रतिक्विंटल २६०० ते २६५० रुपये होते. मंगळवार दि. १५ रोजी याच साखरेचे दर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये झाल्याचे साखर व्यापारी आणि कारखानदारांनी सांगितले. चांगल्या दर्जाच्या साखरेचे दर आठ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल २६५० ते २८०० रुपयांपर्यंत होते. यामध्येही प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण होऊन मंगळवार, दि. १५ रोजी २५०० ते २५५० रुपये दर झाले आहेत. पाकिस्तानच्या साखरेने कारखानदार आणि शेतकºयांचे कंबरडेच मोडल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानातून साखर आयात झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडील साखरेची खरेदीही व्यापाºयांनी थांबविली आहे. अनेक कारखान्यांच्या साखर विक्रीच्या निविदांनाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. हा धोका लक्षात घेऊन तरी सरकारने यापुढे तरी साखरेची आयात थांबवावी.आयात साखरेमुळे डोकेदुखी वाढलीपाकिस्तानची साखर मुंबईत आल्याची बातमी समजल्यापासून व्यापाºयांनी साखर खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. दरातही मोठी घसरण चालू आहे. चार दिवसात क्विंटलला दोनशे रुपयांनी दर घसरुन सध्या लहान साखर प्रतिक्विंटल २४०० ते २४४० रुपये आणि मध्यम साखर प्रति क्विंटल २५०० ते २५५० रुपये झाली आहे. साखरेच्या विक्रीतून शेतकºयांची बिले आणि कारखाना व्यवस्थापनाचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगर कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.शेतकरी, कामगारांचा संयम पाहू नये : अरुण लाडदेशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याची सरकारला कल्पना असतानाही पाकिस्तानातून साखर आयात केली. यातून सहकारी साखर कारखानदारी मोडकळीस आणण्याचाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारखानदारी मोडकळीस आल्यामुळे शेतकरी, कामगारांवर बेकारीची वेळ येणार आहे. म्हणूनच शेतकरी आणि कामगारांचा आणखी अंत केंद्र आणि राज्य सरकारने पाहू नये, असा इशारा क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली