शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पतंगराव कदम यांच्यामुळे पलूस-कडेगावचा लौकिक -: विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:09 IST

विश्वजित कदम म्हणाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसने दिले. भारती विद्यापीठातून बहुजनांची मुले शिकवली. राज्यातील ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक शिक्षित महिला असणारा हा मतदारसंघ आहे. येथील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण पिकांची निर्मिती झाली पाहिजे, औद्योगिक क्रांती झाली पाहिजे.

ठळक मुद्देऔदुंबरला फुटला प्रचाराचा नारळ, महिलांची उल्लेखनीय हजेरी

अंकलखोप/भिलवडी : डॉ. पतंगराव कदम जनतेच्या मनातील राजे होते. पूरग्रस्त पलूस तालुका आणि दुष्काळी कडेगाव तालुका असा पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. पण पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघांचा चेहरामोहरा बदलून देशभर नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी तयार केलेल्या पायावर कळस रचायचे काम तुमचा मुलगा आणि भावाच्या नात्याने करण्यासाठी मी बांधील आहे, असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम यांनी केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर औदुंबर (ता. पलूस) येथे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचाराचा प्रारंभ महिला कार्यकर्त्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम, तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील, श्रीमती विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, महेंद्र लाड आदी उपस्थित होते.विश्वजित कदम म्हणाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसने दिले. भारती विद्यापीठातून बहुजनांची मुले शिकवली. राज्यातील ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक शिक्षित महिला असणारा हा मतदारसंघ आहे. येथील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण पिकांची निर्मिती झाली पाहिजे, औद्योगिक क्रांती झाली पाहिजे. सरकार कोणाचे का असेना, आपल्या मनगटात ताकद आहे.

आमदार पाटील म्हणाल्या की, आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांची कार्यकर्त्यांना उणीव भासू देणार नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विश्वजित कदम यांना निवडून द्यावे.बाळकृष्ण यादव, पलूस तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारुती चव्हाण, काँग्रेसचे पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, डॉ. मीनाक्षी सावंत, मालन मोहिते, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव, शकुंतला मोरे, आवडाबाई सदामते, क्षीतिजा पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

श्वेता बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. लता ऐवळे-कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली पाटील यांनी आभार मानले. यावेळी जयसिंगराव कदम, प्रकाश पवार, आनंदराव मोहिते, जे. के.(बापू) जाधव, घन:श्याम सूर्यवंशी, उदय पाटील, अनिल विभुते, मनीषा रोटे उपस्थित होते.

नारीशक्तीचा सन्मानऔदुंबरच्या डोहात राजकीय मतभेद बुडवून पुरुष नेतेमंडळींनी प्रचाराचे नारळ फोडण्याची परंपरा यावेळी मोडीत काढण्यात आली. प्रथमच सर्वसामान्य महिलांना प्रचाराचा नारळ फोडायला लावून, नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

प्रचाराची यंत्रणा महिलांच्या हातीआपली लढाई विकासाच्या मुद्यावर राहील. मला राज्यभर फिरायचे आहे, तेव्हा प्रचाराची सगळी यंत्रणा महिलांच्या हाती सोपवित असल्याचे विश्वजित कदम यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाsangam chowkसंगम चौक