शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

द्राक्षाला मागणी वाढल्यामुळे दराचीही तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 5:42 PM

उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील

ठळक मुद्देकिलोला ४० ते ७० रुपये दर : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगालच्या व्यापाºयांची गर्दी

अशोक डोंबाळेसांगली : उत्तर भारतामध्येही थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी निर्माण झाली असून, किलोला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील व्यापारी मोठ्याप्रमाणात शेतकºयांच्या बांधापर्यंत जाऊन द्राक्षाची खरेदी करू लागला आहे. काही व्यापारी संघटितपणे द्राक्षाचे दर पाडत असल्यामुळे, त्यांचा जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र जवळपास एक लाख २५ हजार एकर आहे. द्राक्षे हे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक बनले आहे. जिल्ह्याचे उसाचे उत्पन्न चार ते पाच हजार कोटी रुपये आहे, तर द्राक्षाचे उत्पन्न जवळपास सहा हजार कोटींच्या घरात गेले आहे. युरोपियन राष्ट्रांसह एकूण पंचवीसहून अधिक देशांमध्ये सांगलीची द्राक्षे निर्यात होत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही रेसिड्यू फ्री द्राक्षे, बेदाण्याला मागणी वाढत आहे. त्यानुसार पुरवठा करण्याची शेतकºयांनी तयारी ठेवल्यास भविष्यात निश्चित द्राक्षांच्या खपात मोठी वाढ होईल व दरही चांगला मिळेल.

जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात उसासारखे जादा पाण्याचे पीक परवडत नाही. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात द्राक्ष पिकासाठीचे अनेक प्रयोग शेतकरी करीत असून नवीन वाण शोधून काढत आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांनी तर देशाला नवीन वाणाची ओळख करून दिली आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून द्राक्षाची गोडी वाढली. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी योजनांमुळे द्राक्षाचे क्षेत्र दुष्काळी पट्ट्यात मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत.

मिरज तालुक्यातील आरग, बेडग, म्हैसाळ, सोनी, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, बोरगाव, पुणदी, वायफळे, डोंगरसोनी, खानापूर तालुक्यातील पळशी, करंजे, सुलतानगादे, हिवरे, खानापूर, विटा, पारे आणि जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातही द्राक्षाची लागवड वाढली आहे. दुष्काळी शेतकºयांच्या जीवनात द्राक्षामुळे  गोडवा आला आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जोमात सुरु असून सुपर सोनाक्का, सोनाक्का, माणिक चमन, तास-ए-गणेश, थॉमसन या द्राक्षजातींबरोबरच कृष्णा सिडलेस, शरद सिडलेस, ज्योती सिडलेस ही काळी द्राक्षे, लाल-गुलाबी फ्लेम द्राक्षांचे देखील उत्पादन होते. द्राक्षाच्या दर्जानुसार प्रति किलो ३० ते ७० रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कमी होऊ लागल्यामुळे द्राक्षाच्या दरात तेजी येणार आहे. द्राक्षांची निर्यातही मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा