शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

अयोग्य वातावरणामुळे बेदाणा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:38 IST

पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली.

ठळक मुद्दे कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत

गजानन पाटील  । संख : पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. 

पाणी टंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. वर्षभरात ४८.३ मिलिमीटर पाऊस झालो. शेततलाव, कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून बागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. उमदी परिसरामध्ये शेतकºयांनी टँकरने पाणीपुरवठा करून बागा आणल्या आहेत. 

अनुकूल हवामानामुळे यावर्षी द्राक्षवेलींना चांगले घड सुटले होते. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कांड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून बागेला पाणी कमी पडले. खताची मात्रा दिल्यावर पाणी जास्त लागते. पाणी कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड व मणी लहान तयार झाले. द्राक्षात साखर पाहिजे त्याप्रमाणात तयार झाली नाही. बेदाण्यासाठी २६ ते २८ इतके साखरेचे प्रमाण असावे लागते.

मात्र यंदा ते कमी होते. त्यातच अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळेही द्राक्षांमध्ये साखर कमी तयार झाली. परिणामी बेदाणा चपटा झाला. साडेतीन ते चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार तयार झाला नाही. वजनातही घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी एक ते दीड टन आला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा    तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ, संख, बेळोंडगी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकºयांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात १५० ते १९० रुपये भाव मिळत आहे. परंतु  कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय