शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

अयोग्य वातावरणामुळे बेदाणा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:38 IST

पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली.

ठळक मुद्दे कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत

गजानन पाटील  । संख : पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. 

पाणी टंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. वर्षभरात ४८.३ मिलिमीटर पाऊस झालो. शेततलाव, कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून बागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. उमदी परिसरामध्ये शेतकºयांनी टँकरने पाणीपुरवठा करून बागा आणल्या आहेत. 

अनुकूल हवामानामुळे यावर्षी द्राक्षवेलींना चांगले घड सुटले होते. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कांड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून बागेला पाणी कमी पडले. खताची मात्रा दिल्यावर पाणी जास्त लागते. पाणी कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड व मणी लहान तयार झाले. द्राक्षात साखर पाहिजे त्याप्रमाणात तयार झाली नाही. बेदाण्यासाठी २६ ते २८ इतके साखरेचे प्रमाण असावे लागते.

मात्र यंदा ते कमी होते. त्यातच अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळेही द्राक्षांमध्ये साखर कमी तयार झाली. परिणामी बेदाणा चपटा झाला. साडेतीन ते चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार तयार झाला नाही. वजनातही घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी एक ते दीड टन आला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा    तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ, संख, बेळोंडगी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकºयांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात १५० ते १९० रुपये भाव मिळत आहे. परंतु  कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय