शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

प्रचंड पावसामुळेच सांगली, कोल्हापूरमध्ये महापुराची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

सांगली : यावर्षी पुराची कोणतीही शक्यता नसताना व प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतलेली असतानाही सांगली, कोल्हापूर परिसराला पुन्हा एकदा महापुराचा ...

सांगली : यावर्षी पुराची कोणतीही शक्यता नसताना व प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतलेली असतानाही सांगली, कोल्हापूर परिसराला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला. महापुराच्या या परिस्थितीला मानवी चुका अथवा कर्नाटकातील आलमट्टी धरणाचा फुगवटा याचा काहीही संबंध नाही. कोयना, नवजा परिसरात झालेल्या विक्रमी पावसाची जबर किंमत आपल्याला मोजावी लागली. या भागात प्रचंड पाऊस झाल्यानेच महापुराची स्थिती निर्माण झाली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीत केले.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.

पवार म्हणाले, यावर्षी महापुराची कोणतीही शक्यता नव्हती तरीही प्रशासनाने योग्य ती तयारी केली होती. मात्र, कोयना, नवजा परिसरात झालेला पाऊस यास कारणीभूत ठरला आहे. या परिसरात शंभर वर्षांत झाला नाही इतका पाऊस एकावेळी झाला आहे. ३२ इंचापर्यंत पाऊस झाल्याने पाणी वाढून सांगली, कोल्हापूरला पुराचा फटका बसला.

कृष्णा खोऱ्यातील धरणातील पाणीसाठ्यावर सध्या भाष्य होत असलेतरी यात तथ्य नसून अद्यापही कोयनेसह इतर धरणे कमी भरलेली आहेत. तसेच मानवीय चुकांवरही बोट ठेवले जात आहे. मात्र, त्यात या पुराबाबत तथ्य नाही. पाण्याचा विसर्ग व त्याचा फुगवटा होणार नाही यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करत होता. अगदी आलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. राजापूर बंधाऱ्यातून येत असलेल्या विसर्गापेक्षा अधिक विसर्ग तेथून होत असल्याने समन्वयात प्रशासन कुठेही कमी पडले नाही तर प्रचंड पावसामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील १०३ गावांना पुराचा फटका बसला असून, झालेले नुकसानही मोठे आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठीही शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा करण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

चौकट

एनडीआरएफच्या धर्तीवर तुकडीचा विचार

वारंवार निर्माण होत असलेल्या पूरस्थितीनंतर मदतीसाठी एनडीआरएफ, कोस्टल गार्ड, नेव्ही, लष्कराला पाचारण करावे लागते. राज्याचे एसडीआरएफही मदतीसाठी येते. मात्र, तरीही कमी वेळेत संकटात असलेल्यांना मदत मिळावी यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर एक तुकडी करून तिचे केंद्र कराड येथे करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

चौकट

केंद्रानेही जबाबदारी घ्यावी

पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे सरकार कुठेही कमी पडणार नाही. चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा अडीच पट जादाची मदत करण्यात आली. तशीच मदत आताही पूरग्रस्तांना करण्यात येईल. राज्य सरकार जबाबदारी घेईलच; पण केंद्र सरकारनेही जबाबदारी घ्यावी, असेही पवार म्हणाले.