शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड शेतीला पाणी मिळणे जवळपास दुरापास्तच

संख : जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.अनुकूल हवामानात कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक म्हणून डाळिंब प्रसिद्ध आहे. डाळिंबामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला होता. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी शेततळी, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. तालुक्यात यावर्षी केवळ ४०.३ मी. मी. इतकाच पाऊस झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.अनेक भागात सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेतील झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत.

शेतात फक्त वाळलेल्या झाडांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये २०१२ ला दुष्काळ पडला होता. तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागा जगविण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली