शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड शेतीला पाणी मिळणे जवळपास दुरापास्तच

संख : जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.अनुकूल हवामानात कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक म्हणून डाळिंब प्रसिद्ध आहे. डाळिंबामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला होता. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी शेततळी, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. तालुक्यात यावर्षी केवळ ४०.३ मी. मी. इतकाच पाऊस झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.अनेक भागात सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेतील झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत.

शेतात फक्त वाळलेल्या झाडांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये २०१२ ला दुष्काळ पडला होता. तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागा जगविण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली