शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड शेतीला पाणी मिळणे जवळपास दुरापास्तच

संख : जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.अनुकूल हवामानात कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक म्हणून डाळिंब प्रसिद्ध आहे. डाळिंबामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला होता. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी शेततळी, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. तालुक्यात यावर्षी केवळ ४०.३ मी. मी. इतकाच पाऊस झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.अनेक भागात सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेतील झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत.

शेतात फक्त वाळलेल्या झाडांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये २०१२ ला दुष्काळ पडला होता. तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागा जगविण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली