शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत -: उपसाबंदीने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:22 IST

जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे ३.५ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेतपावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.

अशोक डोंबाळे ।सांगली : जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत. जूनचा पहिला आठवडा संपत आला, तरीही पावसाची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्याचा बहुतांशी भाग पावसावर अवलंबून आहे. परंतु यंदा मान्सून वेळेत दाखल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाल्यास पेरण्या शंभर टक्के होतील. पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खरिपासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर बारमाही पाण्याची सोय आहे. तेथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी उसाच्या लागणी वाढल्या आहेत. याशिवाय टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेतून बहुतांशी क्षेत्र पाण्याखाली आले आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावात ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे.

कोयना व चांदोली धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा, तापमानातील वाढ या पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात होईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारपासून जिल्ह्यात उपसाबंदी लागू केली आहे. कृष्णा नदीमधून औद्योगिक व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांसाठी उपसाबंदी आहे. ऊस, केळी आणि भाजीपाल्यासाठी पाणी आवश्यक आहे, परंतु कृष्णा आणि वारणा नदीवर उपसाबंदी लागू करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष पावसाकडे आहे.

जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यातील पेरणी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम या कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील गावांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नदीकाठावरील अनेक गावांत आगाप सोयाबीन केला जातो, परंतु पावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.खते, बियाणे : गोदामात पडूनशिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हटले जाते. तेथे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. हंगामासाठी कृषी सेवा केंद्राची खते आणि बियाणे उपलब्ध होत आहेत. परंतु पाऊस नसल्याने पेरण्या पूर्ण थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून आहेत.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी