शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत -: उपसाबंदीने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:22 IST

जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे ३.५ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेतपावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.

अशोक डोंबाळे ।सांगली : जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत. जूनचा पहिला आठवडा संपत आला, तरीही पावसाची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्याचा बहुतांशी भाग पावसावर अवलंबून आहे. परंतु यंदा मान्सून वेळेत दाखल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाल्यास पेरण्या शंभर टक्के होतील. पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खरिपासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर बारमाही पाण्याची सोय आहे. तेथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी उसाच्या लागणी वाढल्या आहेत. याशिवाय टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेतून बहुतांशी क्षेत्र पाण्याखाली आले आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावात ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे.

कोयना व चांदोली धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा, तापमानातील वाढ या पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात होईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारपासून जिल्ह्यात उपसाबंदी लागू केली आहे. कृष्णा नदीमधून औद्योगिक व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांसाठी उपसाबंदी आहे. ऊस, केळी आणि भाजीपाल्यासाठी पाणी आवश्यक आहे, परंतु कृष्णा आणि वारणा नदीवर उपसाबंदी लागू करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष पावसाकडे आहे.

जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यातील पेरणी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम या कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील गावांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नदीकाठावरील अनेक गावांत आगाप सोयाबीन केला जातो, परंतु पावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.खते, बियाणे : गोदामात पडूनशिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हटले जाते. तेथे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. हंगामासाठी कृषी सेवा केंद्राची खते आणि बियाणे उपलब्ध होत आहेत. परंतु पाऊस नसल्याने पेरण्या पूर्ण थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून आहेत.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी