शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांना ‘डाऊनी मिलिड्यू’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:29 IST

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही ...

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश बागा पोंगा अवस्थेत दावण्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत. आॅगस्ट छाटणीच्या बागांमध्येही फुलोºयात मोठ्या प्रमाणात गळ होऊन बागांना फटका बसला होता. या सर्व संकटांतून ज्या द्राक्षबागा वाचल्या, त्या आता पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. राज्यात १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. पश्चिम महाराष्टÑासह सांगली जिल्ह्यात दोन दिवसात पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अगोदरच डाऊनी मिलिड्यूचा प्रादुर्भाव असणाºया द्राक्षबागांमध्ये हा रोग थैमान घालू लागला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याने दमट हवामानामध्ये डाऊनीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना या रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे.औषध फवारणी...फुलोºयातील बागांवर या ढगाळ हवामानामुळे अळीचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वच अवस्थेतील बागांना खराब हवामानाने घेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा दिवस-रात्र औषध फवारणीत व्यस्त दिसत आहेत.पावसाचा शिडकावामिरज पूर्व भागातील सीमावर्ती सलगरे व चाबुकस्वारवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान तर होतेच, पण भर दुपारी बारा वाजता या भागात काही मिनिटे पावसाचा शिडकावा झाला. पण सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही.बुरशीजन्य औषधांचा खर्च दुपटीने वाढलायावर्षी महिनाभर रेंगाळलेला परतीचा मान्सून व नंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व ढगाळ हवामान यामुळे बुरशीजन्य औषधांच्या फवारणीत वाढ करावी लागल्याने, एकरी द्राक्ष उत्पादनामधील औषधांचा खर्च वाढत आहे. याशिवाय द्राक्षांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे. आॅगस्ट छाटणीच्या पक्व झालेल्या द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे धोका निर्माण झाला आहे.ं

टॅग्स :agricultureशेती