शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:41 IST

मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा..घाटमाथ्यावरील स्थिती हवामान बदलाने द्राक्षबागायतदार हवालदिलपावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई

घाटनांद्रे ,दि. ३० :  मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

घाटमाथ्यावरील नागज, कुची, जाखापूर, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात पोषक व पूरक वातावरण असल्यामुळे बळीराजाने नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनावर भर दिल्याने या भागात द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून घाटमाथ्यावर एकही दमदार पाऊस न झाल्याने अद्यापही तलाव, ओढे, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत आहेत.

कूपनलिका, विहिरीही जेमतेमच आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वेळोवेळी सहन करावा लागत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागाही काढून टाकल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅँकरच्या पाण्याद्वारे बागा कशातरी जगविल्या. घाटमाथ्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, तसेच खते व औषधांच्या वाढत्या किमतीला सामोरे जात पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या द्राक्षबागा, निसर्गात सध्या अचानक होणाऱ्या वातावरण बदलाने पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत.

अशा भीषण काळातही शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. पण गेल्या आठवड्यापासून दिवसा कडक ऊन, कधी तर पावसाचा शिडकावा, रात्री थंडी व पहाटेच्या वेळी धुके, यामुळे भुरी, दावण्या, मिलिबग्ज यासारख्या रोगांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून शेतकºयांना चोवीस तास हवामानाचा वेध घेत बागेतच थांबावे लागत आहे.सध्या जवळजवळ सर्वच बागांची फळछाटणी झाली असून, काही बागा फुलोऱ्यात आहेत.

त्याचबरोबर आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे मणी मऊ पडू लागले आहेत. तेथे माल तयार होऊ लागला आहे. अशा द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा हातून जातात की काय, याचा विचार करत शेतकरी रात्रं-दिवस बागांवर औषध फवारणी करत आहे.

दुष्काळात तेरावा..हवामानातील बदलांचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याची सोय करून द्राक्षबागा जगविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यानंतर हवामानातील बदलांचा फटका बसून बागा हातच्या जाऊ लागल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशीच अवस्था बागायतदारांची झाली आहे. द्राक्षबागायतदार या हवामान बदलाने चांगलाच हवालदिल झाला आहे. ​

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली