शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:41 IST

मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा..घाटमाथ्यावरील स्थिती हवामान बदलाने द्राक्षबागायतदार हवालदिलपावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई

घाटनांद्रे ,दि. ३० :  मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे.

घाटमाथ्यावरील नागज, कुची, जाखापूर, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात पोषक व पूरक वातावरण असल्यामुळे बळीराजाने नगदी पीक म्हणून द्राक्ष उत्पादनावर भर दिल्याने या भागात द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून घाटमाथ्यावर एकही दमदार पाऊस न झाल्याने अद्यापही तलाव, ओढे, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत आहेत.

कूपनलिका, विहिरीही जेमतेमच आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वेळोवेळी सहन करावा लागत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागाही काढून टाकल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅँकरच्या पाण्याद्वारे बागा कशातरी जगविल्या. घाटमाथ्यावर पावसाने वक्रदृष्टी दाखविल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, तसेच खते व औषधांच्या वाढत्या किमतीला सामोरे जात पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या द्राक्षबागा, निसर्गात सध्या अचानक होणाऱ्या वातावरण बदलाने पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत.

अशा भीषण काळातही शेतकऱ्यांनी बागा जगविल्या. पण गेल्या आठवड्यापासून दिवसा कडक ऊन, कधी तर पावसाचा शिडकावा, रात्री थंडी व पहाटेच्या वेळी धुके, यामुळे भुरी, दावण्या, मिलिबग्ज यासारख्या रोगांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून शेतकºयांना चोवीस तास हवामानाचा वेध घेत बागेतच थांबावे लागत आहे.सध्या जवळजवळ सर्वच बागांची फळछाटणी झाली असून, काही बागा फुलोऱ्यात आहेत.

त्याचबरोबर आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे मणी मऊ पडू लागले आहेत. तेथे माल तयार होऊ लागला आहे. अशा द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या बागा हातून जातात की काय, याचा विचार करत शेतकरी रात्रं-दिवस बागांवर औषध फवारणी करत आहे.

दुष्काळात तेरावा..हवामानातील बदलांचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याची सोय करून द्राक्षबागा जगविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यानंतर हवामानातील बदलांचा फटका बसून बागा हातच्या जाऊ लागल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशीच अवस्था बागायतदारांची झाली आहे. द्राक्षबागायतदार या हवामान बदलाने चांगलाच हवालदिल झाला आहे. ​

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली