शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Sangli: हवेत धुळीचे लोट उडवीत चिंतामणीनगर पूल खुला, काम अर्धवटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:50 IST

दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाची दुहेरी वाहतूक सोमवारपासून सुरू झाली. मात्र, काम अर्धवट स्थितीत असल्याने वाहतुकीच्या वर्दळीने धुळीचे लोट हवेत उडत आहेत. वायूप्रदूषणाची कमाल पातळी गाठत या पुलाचे कवित्व अद्याप सुरूच आहे.चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर संपत आला तरी अजून पूर्ण झालेले नाही. १ ऑक्टोबरपासून अर्धवट स्थितीत असलेला एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावरून अवजड वाहनांना बंदीचा फलक लावला तरी मोठमोठे कंटेनरही यावरून धावत आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. एका बाजूने वाहतूक सुरू असताना दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू होते. ते काही प्रमाणात पूर्ण करून आता दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.मात्र, दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ वाढल्याने तसेच येथील डांबरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने धुळीचे लोट हवेत उडत आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाने येथे कमाल मर्यादा ओलांडली आहे. कामाच्या मुदतवाढीच्याही कमाल मर्यादा या पुलाने ओलांडल्या आहेत. अनेकदा मुदतवाढ घेऊनही अजून काम पूर्णत्वास गेलेले नाही. केवळ वाहतूक सुरू करण्याची औपचारिकता पार पाडली गेली.पुलाचे काम प्रदीर्घ काळ रेंगाळत राहिले. आता नोव्हेंबर २०२४ पर्यंतची मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे ओबडधोबड रस्त्यावरून वाहतुकीची कसरत नागरिकांना आणखी काही दिवस करावी लागणार आहे.

नागरिकांची नाराजी कायमरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांमधून नाराजी कायम आहे. शहरातील अन्य खराब रस्त्यांसह पुलाच्या खड्डेमय रस्त्यामुळे शारीरिक दुखणे नागरिकांना सोसावे लागत आहे.

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. लवकरच या पुलाची वास्तुशांती घालून जेवण करण्यात येणार आहे. जेवण व वास्तुशांतीसाठी वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहन आम्ही संघटनेच्या वतीने केले आहे. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हा

टॅग्स :Sangliसांगली