शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालणार!- - पंढरीनाथ नागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:44 IST

आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू झाल्याने आता नागरिकांना स्वस्त व दर्जेदार सफरचंद उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. - पंढरीनाथ नागणे

ठळक मुद्देआटपाडीत सौदे : ग्राहकांना दिलासा

अविनाश बाड ।दुष्काळी आटपाडीत थेट सफरचंदाचे सौदे सुरू झाले. कारण काही वर्षांपूर्वी आजारी पडले तरच घरात सफरचंद आणली जायची. आता मात्र उपवासालाच नव्हे, तर दररोज फळे खाणाऱ्यांची, किंवा एकवेळ जेवण आणि सायंकाळी फक्त फळे खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे व्यावसायिक फायद्याबरोबरच भागात स्वस्त, दर्जेदार आणि ताजी सफरचंद मिळावीत यासाठी आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू केले, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी दिली.

प्रश्न : आटपाडीसारख्या दुष्काळी भागात सफरचंदाचे सौदे करण्याची कल्पना कशी सुचली? त्यासाठी काय-काय करावे लागले?उत्तर : सफरचंद जेवढ्या उंच भागावरील असेल तितके चांगले. आटपाडी, पंढरपूर, मंगळवेढा, जत, खानापूर, दहीवडी, खटाव, अकलूज या परिसरात दरवर्षी सुमारे ३०० ट्रक सफरचंद खपतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र वर्षभर खपणारे एकमेव फळ आहे. त्यातून ही कल्पना सुचली. १९९६ पासून डाळिंब व्यवसायात आहे. देशभर डाळिंबामुळे व्यापाºयांशी संबंध आले. पाच वर्षे आपल्या भागात किती सफरचंद विकतात, त्याचे सर्वेक्षण केले. मग जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तिथल्या शेतकºयांशी मैत्रीच केली. दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालण्याचे समाधान जास्त आहे.

प्रश्न : इतरांच्या तुलनेत ग्राहकांना ताजी आणि कमी दरात सफरचंद आटपाडीत कशी काय मिळतील?उत्तर : आता इंटरनेटचा जमाना आहे. सफरचंद तोडण्यापासून ट्रक भरेपर्यंतचे फोटो-व्हिडीओ तिथून पाठवतात. ट्रकला जीपीएस प्रणाली लावल्यामुळे माल कुठेपर्यंत आला, तेही कळते. पाचव्या दिवशी आटपाडीत सकाळी विक्री होते. विक्रीच्या दिवशी पहाटे येथे ट्रक यावा, असे नियोजन करतो. येथे व्यापारी दुसºया पेठेतून सफरचंद आणत होते. हे अंतर, त्याची वाहतूक याचे पैसे वाचतात. शिवाय दुसºया बाजारपेठेत गेल्यास तेथे मुक्काम करावा लागला, तर तोही खर्च वाचतोय्. शेतकरी ते छोटा व्यापारी यांचे कमिशन वाचते. त्यामुळे इतरांच्या तुलनेत येथे कमी दरात सफरचंद मिळतात.यापुढे काय आव्हाने आहेत?सर्वात आधी कोणी धाडस करत नाही. पण प्रतिसाद मिळाला की, अनेकजण कॉपी करतात. मग सगळा विचका होऊ शकतो. मी दहावीत हिंदी सोडून सगळ्या विषयात नापास झालो. शाळा सोडली, पण मला येत असलेल्या हिंदीच्या जोरावर देशातील सगळ्या बाजार समित्या पालथ्या घातल्या. या भागातून पहिल्यांदा डाळिंब विकायला दुबईला गेलो. अनेक देश फिरलो. निकोप स्पर्धा असली, तर चुरस निर्माण होते. ग्राहकांनाही त्याचा फायदा होतो. पण यापुढे या दुष्काळी भागात आंब्याचे सौदे करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेली तीन वर्षे कोकणात जाऊन पाहणी व अभ्यास करतो आहे.तीन प्रतीत सफरचंदांची विभागणी होते. अगदी हलक्या प्रतीच्या सफरचंदाला गिराण म्हणतात. दुसºया प्रतीची सफरचंद आठ-दहा दिवस टिकतात. ज्युससाठी किंवा अनेक ठिकाणी काळ्या, तांबूस डागासह विकली जातात. प्रथम दर्जाची सफरचंद शीतगृहाशिवाय एक महिना टिकतात. परिसरात त्यांचा सुगंध दरवळतो.

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे