शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सांगली जिल्ह्यात दुष्काळ! सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा; मार्चमध्ये तीव्रता वाढण्याची चिन्हे

By संतोष भिसे | Updated: February 12, 2024 18:00 IST

संतोष भिसे सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ ...

संतोष भिसे

सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ गावे आणि ३९२ वाड्यावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून ५३ गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये जत तालुक्यातील ५०, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावेजत : निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ - प्रत्येकी १. सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ - प्रत्येकी २. एकूण टँकर : ५०आटपाडी : आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर - उंबरगाव प्रत्येकी १. एकूण टँकर : ०३

म्हैसाळ योजनेने तारलेसध्या म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असून जत तालुक्यात पाणी पोहोचले आहे. या पाण्यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील बहुतांश गावांच्या पाझर तलावांत पाणी टिकून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तूर्त तरी नाही. अर्थात, मार्चअखेरपासून टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ