शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

सांगली जिल्ह्यात दुष्काळ! सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा; मार्चमध्ये तीव्रता वाढण्याची चिन्हे

By संतोष भिसे | Updated: February 12, 2024 18:00 IST

संतोष भिसे सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ ...

संतोष भिसे

सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ गावे आणि ३९२ वाड्यावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून ५३ गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये जत तालुक्यातील ५०, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावेजत : निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ - प्रत्येकी १. सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ - प्रत्येकी २. एकूण टँकर : ५०आटपाडी : आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर - उंबरगाव प्रत्येकी १. एकूण टँकर : ०३

म्हैसाळ योजनेने तारलेसध्या म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असून जत तालुक्यात पाणी पोहोचले आहे. या पाण्यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील बहुतांश गावांच्या पाझर तलावांत पाणी टिकून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तूर्त तरी नाही. अर्थात, मार्चअखेरपासून टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ