शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

दुष्काळ अन् कर्जानं जगणं कठीण झालंय! : ‘हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:58 IST

गेल्या ६० वर्षात पेरणीला सुद्धा पाऊस आला नाही, असं यंदा घडलंय. शेतात पीक न्हाई, प्यायला पाणी न्हाई, हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई, अनेकांनी जगण्यासाठी

ठळक मुद्देग्रामस्थांच्या व्यथा’; केंद्रीय पथकाकडून आटपाडी तालुक्यात दुष्काळाची पाहणी

आटपाडी : गेल्या ६० वर्षात पेरणीला सुद्धा पाऊस आला नाही, असं यंदा घडलंय. शेतात पीक न्हाई, प्यायला पाणी न्हाई, हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई, अनेकांनी जगण्यासाठी गाव सोडलंय... डोक्यावरच्या कर्जानं जगणं कठीण झालंय... अशी दैना अनेक शेतकऱ्यांनी गुरुवारी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर मांडली.

आटपाडी तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, पशुधन व दुग्धविकास विभागाचे सहसंचालक एल. जी. टेंभुर्णे, चारा विशेषज्ज्ञ विजय ठाकरे यांच्या पथकाने भेट दिली. पात्रेवाडी, लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे आणि मुढेवाडी या गावांतील शेतकºयांची भेट घेऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, पुणे विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, जि. प. सदस्य अरुण बालटे उपस्थित होते.

पाण्याअभावी जळालेली पिके, कोरड्या विहिरी, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आलेले दारिद्र्य, शेतकºयांंच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, इथे चारा नसल्याने मेंढपाळांनी कोकणात केलेले स्थलांतर, ऊस तोडणीसाठी गाव सोडलेल्यांची बंद घरे, कोरडे ओढे याची पथकाकडून पाहणी केली.

पथकातील अधिकाºयांनी थेट शेतकºयांशीच चर्चा केली. जनावरे किती आहेत, पाण्याची अवस्था काय आहे, सध्या काय व्यवस्था केलीय... असे प्रश्न विचारून अधिकाºयांनी शेतकºयांची परिस्थिती जाणून घेतल्या.लेंगरेवाडीत शेतकºयांकडून कर्जमाफीची मागणीकरगणी (ता. आटपाडी) : ‘साहेब, कोरड्या पडलेल्या विहिरी अन् चाºयाअभावी ओरडणाºया जनावरांच्या हंबरड्यानं काळजाचं पाणी होऊ लागलंय. पाऊस नाही, पेरलेलं उगवलंच नाही. आता खायचं काय? पेरणीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कस’?’ अशा शब्दात लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकºयांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर व्यथा मांडल्या. निसर्गाने मारले, आता शासनाने तरी मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी यावेळी केली. शासनाने संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय जगू शकणार नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.गदिमांचे गाव कोरडे!थोर साहित्यिक ग. दि. माडगूळ यांच्या माडगुळे या गावाला पथकाने भेट दिली. माडगूळकरांनी लिहिलेल्या कोरड्या ओढ्याच्या पात्रात जलसंधारणाचे चांगले काम झाले आहे. सरपंच संजय विभुते, मनोहर विभुते, हेमंत कुलकर्णी यांनी, ओढापात्र कोरडे पडले आहे, जनावरांसाठी चाºयाची व्यवस्था करावी अन्यथा जनावरे कत्तलखान्याकडे जातील, अशी भीती व्यक्त केली.टॅँकरने डाळिंबाला पाणी देतोय...लेंगरेवाडी येथे एक दिवसआड दोन हजार रुपये खर्चून एक टॅँकर पाणी विकत घेऊन डाळिंबाच्या बागेला देतोय. त्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, अशी कैफियत दुर्योधन विठोबा लेंगरे, धनाजी लेंगरे, हरिदास लेंगरे या शेतकºयांनी मांडली. दुष्काळामुळे ६० टक्के कुटुंबांनी जगण्यासाठी गाव सोडल्याचेही शेतकºयांनी सांगितले. 

कोरड्या विहिरी, ओसाड माळरानआटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांतील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांना खाण्यासाठी चारा नसल्याने, दावणीला बांधलेली जनावरे हंबरडा फोडत आहेत. माळरानावर कुसळाशिवाय काहीच नसल्याने, येणाºया उन्हाळ्यात भयावह परिस्थिती उद्भवणार आहे. जनावरे जगविण्यासाठी शासनाने चारा, पाण्याची सोय न केल्यास, जनावरे कत्तलखान्याकडे जातील, अशी भीती शेतकºयांनी पाहणी पथकापुढे व्यक्त केली.लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे केंद्रीय पथकातील निती आयोगाचे संचालक सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी खा. संजय पाटील, आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात केंद्रीय पथकासमोर शेतकºयांनी व्यथा मांडली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार