शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

By admin | Updated: October 16, 2015 23:10 IST

सांगली जिल्हा : दुष्काळ की टंचाई परिस्थिती; याबाबत संभ्रम कायम

सांगली : पावसाने फिरवलेली पाठ आणि टंचाई परिस्थिती गंभीर होत चालली असतानाच, शुक्रवारी राज्य शासनाने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, नक्की ‘दुष्काळी’ की ‘टंचाईसदृश’ गावे, याबाबत रात्रीपर्यंत तरी साशंकता कायम होती. जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत ठोस माहिती नसल्याने जिल्ह्यातील ‘ती’ ३६३ गावे कोणती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील दुष्काळी गावांची यादी प्राप्त होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. यंदा मान्सूनने दगा दिल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊसमान जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्याचा काही भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी, ही तात्पुरती मलमपट्टी पुरेशी नसल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी बाळगून होता.अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केल्याची माहिती सोशल माध्यमातून जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील गावांच्या समावेशाविषयी उत्सुकता वाढली होती. कारण दुष्काळी अथवा टंचाई परिस्थितीत गावांना शासकीय फायदे मिळत असल्याने व इतर फीमध्ये सवलत अथवा माफी मिळत असल्याने आपल्या गावाचा यादीत समावेश आहे का, याची प्रत्येकजण खात्री करून घेत होता. सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागात संपर्क साधल्यानंतरही याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, जिल्ह्यातील ३६३ गावांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.यापूर्वी राज्य शासनाने टंचाईसदृशची घोषणा होत असताना तालुक्यांची नावे घोषित करण्यात येत होती. मात्र, यावेळी तालुक्यांऐवजी गावांचीच नावे घोषित करण्यात आल्याने संभ्रमात भर पडली आहे. त्यात शासकीय स्तरावर दुष्काळ जाहीर करण्यात अनेक अडचणी असल्याने टंचाई परिस्थिती जाहीर झाली असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शासनाकडून सवलतींचा वर्षाव...घोषित केलेल्या सवलतींनुसार कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंदे्र तातडीने सुरू करण्यात येणार आहेत.