शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

By admin | Updated: October 16, 2015 23:10 IST

सांगली जिल्हा : दुष्काळ की टंचाई परिस्थिती; याबाबत संभ्रम कायम

सांगली : पावसाने फिरवलेली पाठ आणि टंचाई परिस्थिती गंभीर होत चालली असतानाच, शुक्रवारी राज्य शासनाने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, नक्की ‘दुष्काळी’ की ‘टंचाईसदृश’ गावे, याबाबत रात्रीपर्यंत तरी साशंकता कायम होती. जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत ठोस माहिती नसल्याने जिल्ह्यातील ‘ती’ ३६३ गावे कोणती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील दुष्काळी गावांची यादी प्राप्त होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. यंदा मान्सूनने दगा दिल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊसमान जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्याचा काही भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी, ही तात्पुरती मलमपट्टी पुरेशी नसल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी बाळगून होता.अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केल्याची माहिती सोशल माध्यमातून जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील गावांच्या समावेशाविषयी उत्सुकता वाढली होती. कारण दुष्काळी अथवा टंचाई परिस्थितीत गावांना शासकीय फायदे मिळत असल्याने व इतर फीमध्ये सवलत अथवा माफी मिळत असल्याने आपल्या गावाचा यादीत समावेश आहे का, याची प्रत्येकजण खात्री करून घेत होता. सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागात संपर्क साधल्यानंतरही याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, जिल्ह्यातील ३६३ गावांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.यापूर्वी राज्य शासनाने टंचाईसदृशची घोषणा होत असताना तालुक्यांची नावे घोषित करण्यात येत होती. मात्र, यावेळी तालुक्यांऐवजी गावांचीच नावे घोषित करण्यात आल्याने संभ्रमात भर पडली आहे. त्यात शासकीय स्तरावर दुष्काळ जाहीर करण्यात अनेक अडचणी असल्याने टंचाई परिस्थिती जाहीर झाली असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शासनाकडून सवलतींचा वर्षाव...घोषित केलेल्या सवलतींनुसार कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंदे्र तातडीने सुरू करण्यात येणार आहेत.