शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

By admin | Updated: October 16, 2015 23:10 IST

सांगली जिल्हा : दुष्काळ की टंचाई परिस्थिती; याबाबत संभ्रम कायम

सांगली : पावसाने फिरवलेली पाठ आणि टंचाई परिस्थिती गंभीर होत चालली असतानाच, शुक्रवारी राज्य शासनाने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, नक्की ‘दुष्काळी’ की ‘टंचाईसदृश’ गावे, याबाबत रात्रीपर्यंत तरी साशंकता कायम होती. जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत ठोस माहिती नसल्याने जिल्ह्यातील ‘ती’ ३६३ गावे कोणती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील दुष्काळी गावांची यादी प्राप्त होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. यंदा मान्सूनने दगा दिल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊसमान जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्याचा काही भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी, ही तात्पुरती मलमपट्टी पुरेशी नसल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी बाळगून होता.अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केल्याची माहिती सोशल माध्यमातून जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील गावांच्या समावेशाविषयी उत्सुकता वाढली होती. कारण दुष्काळी अथवा टंचाई परिस्थितीत गावांना शासकीय फायदे मिळत असल्याने व इतर फीमध्ये सवलत अथवा माफी मिळत असल्याने आपल्या गावाचा यादीत समावेश आहे का, याची प्रत्येकजण खात्री करून घेत होता. सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागात संपर्क साधल्यानंतरही याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, जिल्ह्यातील ३६३ गावांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.यापूर्वी राज्य शासनाने टंचाईसदृशची घोषणा होत असताना तालुक्यांची नावे घोषित करण्यात येत होती. मात्र, यावेळी तालुक्यांऐवजी गावांचीच नावे घोषित करण्यात आल्याने संभ्रमात भर पडली आहे. त्यात शासकीय स्तरावर दुष्काळ जाहीर करण्यात अनेक अडचणी असल्याने टंचाई परिस्थिती जाहीर झाली असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)शासनाकडून सवलतींचा वर्षाव...घोषित केलेल्या सवलतींनुसार कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंदे्र तातडीने सुरू करण्यात येणार आहेत.