शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा, मात्र..

By अशोक डोंबाळे | Updated: September 27, 2024 18:57 IST

रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार

सांगली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार १०८ टक्केवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४७ टक्के जादा पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. चक्क ३९ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार आहे.मान्सून पाऊस संततधार झाला आहे. सध्या परतीच्या पावसाची ही दमदार सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत १०८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच तलावांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यामध्ये सिद्धेवाडी (ता. तासगाव), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि मोरणा (ता. शिराळा) हे मोठे पाझर तलाव आहेत. या तलावांची १ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. द्या या तलावांमध्ये १हजार ४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. यापैकी मोरणा, सिद्धेवाडी आणि बसाप्पावाडी तलाव १०० टक्के भरले असून दोड्डनाला ३६ टक्के तर संख आजही कोरडा आहे.

छोट्या तलावांची संख्या ७८ असून यामध्ये ६ हजार १५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. सध्या या तलावांमध्ये ४ हजार ३७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जवळपास ७३ टक्के छोटे तलाव भरले आहेत. तासगाव, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आटपाडी, खानापूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांमधील ३९ तलाव १०० टक्के भरले आहेत.

..तरीही १२ तलाव कोरडेचजत तालुक्यातील ११ आणि आटपाडी तालुक्यातील १ असे १२ तलाव आजही कोरडेच आहेत. कोरडे तलाव जत तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

असा आहे पाणीसाठातालुका - तलाव संख्या - पाणीसाठ्याची टक्केवारीतासगाव - ७  - १००खानापूर - ८ - ८७कडेगाव - ७  - ८०शिराळा - ५  - १००आटपाडी - १३ - ८४जत - २७ - ३८क.महांकाळ - ११ - ८५मिरज - ०३ - ९७वाळवा - ०२ - १००

मागील वर्षी २३ टक्के पाणीसाठामागील वर्षी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील मोठ्या पाच तलावांमध्ये ३३ टक्के तर छोट्या ७८ तलावांमध्ये २० टक्केच पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यात सरासरी केवळ २३ टक्केच पाणीसाठा होता. यामुळे जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये जवळपास १०० टँकर पिण्याच्या पाण्यासाठी चालू होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीRainपाऊस