शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा, मात्र..

By अशोक डोंबाळे | Updated: September 27, 2024 18:57 IST

रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार

सांगली : हवामान विभागाच्या अंदाजानुसार १०८ टक्केवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४७ टक्के जादा पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. चक्क ३९ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर होणार आहे.मान्सून पाऊस संततधार झाला आहे. सध्या परतीच्या पावसाची ही दमदार सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत १०८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच तलावांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यामध्ये सिद्धेवाडी (ता. तासगाव), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि मोरणा (ता. शिराळा) हे मोठे पाझर तलाव आहेत. या तलावांची १ हजार ७५० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. द्या या तलावांमध्ये १हजार ४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. यापैकी मोरणा, सिद्धेवाडी आणि बसाप्पावाडी तलाव १०० टक्के भरले असून दोड्डनाला ३६ टक्के तर संख आजही कोरडा आहे.

छोट्या तलावांची संख्या ७८ असून यामध्ये ६ हजार १५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. सध्या या तलावांमध्ये ४ हजार ३७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जवळपास ७३ टक्के छोटे तलाव भरले आहेत. तासगाव, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. आटपाडी, खानापूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांमधील ३९ तलाव १०० टक्के भरले आहेत.

..तरीही १२ तलाव कोरडेचजत तालुक्यातील ११ आणि आटपाडी तालुक्यातील १ असे १२ तलाव आजही कोरडेच आहेत. कोरडे तलाव जत तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

असा आहे पाणीसाठातालुका - तलाव संख्या - पाणीसाठ्याची टक्केवारीतासगाव - ७  - १००खानापूर - ८ - ८७कडेगाव - ७  - ८०शिराळा - ५  - १००आटपाडी - १३ - ८४जत - २७ - ३८क.महांकाळ - ११ - ८५मिरज - ०३ - ९७वाळवा - ०२ - १००

मागील वर्षी २३ टक्के पाणीसाठामागील वर्षी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील मोठ्या पाच तलावांमध्ये ३३ टक्के तर छोट्या ७८ तलावांमध्ये २० टक्केच पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यात सरासरी केवळ २३ टक्केच पाणीसाठा होता. यामुळे जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये जवळपास १०० टँकर पिण्याच्या पाण्यासाठी चालू होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीRainपाऊस