शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली येथील प्राणी गणनेबाबत उदासीनता; सागरेश्वर, राधानगरी अभयारण्यात मात्र होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:57 IST

वनविभाग अद्याप संभ्रमात

आनंदा सुतारवारणावती : अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागामार्फत दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. पण, यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारी प्राणी गणना होणार की नाही याबाबत शंका बळावत आहे.यंदाच्या प्राणी गणनेबाबत वन विभागाची उदासीनता असल्याची चर्चा प्राणीमित्र व नागरिकांतून चांदोली परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण असे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस वन विभागामार्फत प्राणी गणनेस येणाऱ्या प्राणी मित्रांची नावे नोंदवली जातात. त्यांना वन अधिकाऱ्यांबरोबर अभयारण्यात प्राणी गणनेसाठी घेऊन गेले जाते.व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली विभागणी तसेच, अधिकाऱ्यांची कर्तव्यातील चालढकल या गोष्टींच्या अभावाने चांदोलीत २२ व २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना थांबणार की काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून मिळाली.

वनविभाग अद्याप संभ्रमातमागील चार दिवसांपासून कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीस्थित उप विभागीय वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसून दोन दिवसांत काही माहिती मिळाल्यास कळवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग