शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Sangli: चांदोली येथील प्राणी गणनेबाबत उदासीनता; सागरेश्वर, राधानगरी अभयारण्यात मात्र होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:57 IST

वनविभाग अद्याप संभ्रमात

आनंदा सुतारवारणावती : अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागामार्फत दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. पण, यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारी प्राणी गणना होणार की नाही याबाबत शंका बळावत आहे.यंदाच्या प्राणी गणनेबाबत वन विभागाची उदासीनता असल्याची चर्चा प्राणीमित्र व नागरिकांतून चांदोली परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण असे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस वन विभागामार्फत प्राणी गणनेस येणाऱ्या प्राणी मित्रांची नावे नोंदवली जातात. त्यांना वन अधिकाऱ्यांबरोबर अभयारण्यात प्राणी गणनेसाठी घेऊन गेले जाते.व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली विभागणी तसेच, अधिकाऱ्यांची कर्तव्यातील चालढकल या गोष्टींच्या अभावाने चांदोलीत २२ व २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना थांबणार की काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून मिळाली.

वनविभाग अद्याप संभ्रमातमागील चार दिवसांपासून कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीस्थित उप विभागीय वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसून दोन दिवसांत काही माहिती मिळाल्यास कळवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग