दुहेरी की तिहेरी... यावरच विजयाचा गुलाल!

By Admin | Updated: June 15, 2014 00:21 IST2014-06-15T00:21:16+5:302014-06-15T00:21:55+5:30

महायुतीत इच्छुक वाढले : लोकसभा निवडणुकीने गणिते बदलली

Double Triple ... Only Gulaal of victory! | दुहेरी की तिहेरी... यावरच विजयाचा गुलाल!

दुहेरी की तिहेरी... यावरच विजयाचा गुलाल!

विकास शहा ल्ल शिराळा
आधीच तिघांचा दावा, त्यात चौथ्याचा प्रवेश आणि लोकसभा निकालानंतर तर फुटलेले इच्छुकांचे पेव, असे चित्र शिराळा विधानसभा मतदारसंघात दिसू लागले आहे. वर्षभरापासूनच विधानसभेचे पडघम वाजू लागल्याने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपापली ताकद दाखवून दिली. विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि कॉँग्रेसचे सत्यजित देशमुख हे शिराळ्याचे प्रमुख दावेदार. त्यात आता जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांचाही प्रवेश झाला असून, मनसेचे तानाजी सावंत, भाजपचे प्रतापराव पाटील, सेनेचे संतोष हिरुगडे यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.
१९९५ पासून शिराळ्यातील राजकीय घडामोडी वेगवान बनल्या. सतत राजकीय उलथापालथींमुळे हा मतदारसंघ संवेदनशील बनला. ‘बंडखोरीतून आमदारकी’ असे गणित येथे तयार झाले आहे. शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक आणि आता मानसिंगराव नाईक यांची आमदारकी हेच सांगते. विशेष म्हणजे या तिन्ही गटांनी दरवेळी वेगवेगळी आघाडी केली.
लोकसभा निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीमच झाली. कारण शिवाजीराव नाईक हे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या, तर आमदार नाईक व देशमुख गट कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचारयंत्रणेत उतरले होते. आता स्वत:च्या विजयानंतर खा. शेट्टी यांनी शिवाजीराव नाईक यांना विधानसभेत निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत.
विशेष म्हणजे तिन्ही गटांनी आपापली उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यंदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार की कॉँग्रेसला यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. मानसिंगराव आणि शिवाजीराव नाईक यांनी यंदा पुन्हा निवडणूक लढवणारच, असे सांगितले आहे, तर सत्यजित देशमुखही काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरते. लोकसभा निवडणुकीत ते ‘बॅकफूट’वर गेल्याने आता रंगत वाढली आहे. सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत तिकिटासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यातच जयंत पाटील हे त्यांचे साडू असल्याने त्यांचेही वजन देशमुख यांच्यासाठी उपयोगी ठरेल.
गेल्या वर्षभरात पेठचे जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांचे नाव काँग्रेसच्या गोटातून पुढे आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यंदा दुसऱ्यांदा रिंगणात उतरणार आहेत. मोदी लाटेचा फायदा करून घेण्यासाठी भाजपचे प्रतापराव पाटील, शिवसेनेचे संतोष हिरुगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांनीही विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

Web Title: Double Triple ... Only Gulaal of victory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.