शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: November 4, 2023 18:05 IST

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका

सांगली : येथील दत्त इंडियाचे व्यवस्थापन पैसे मिळविण्यासाठीच इथे आले आहे. शेतकऱ्यांना लुटून वसंतदादा साखर कारखाना चालविण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना गतवर्षीच्या गळीत हंगामास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये हप्ता मिळालाच पाहिजे. मागील गळिताचा हिशोब द्या, अन्यथा कारखाना बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा शनिवारी सकाळी वसगडे (ता. पलूस), नांद्रे कर्नाल मार्गे मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आली. पदयात्रेचे अनेक गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळमध्ये जन आक्रोश पदयात्रेवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. राजू शेट्टी पुढे म्हणाले, कारखानदार नफ्यातील वाटा द्यायला तयार नाहीत. मात्र, गेल्या वर्षीचे ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखरेचा भाव वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांना ज्यादाचे जे पैसे मिळाले आहेत, त्यातील ४०० रुपये आम्ही मागत आहोत. त्यामुळे तत्काळ ४०० रुपये द्यावेत, यंदाचा योग्य दर जाहीर करावा, अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, श्रीपाल चौगुले, अजित लांडे, कुमार पाटील आदी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाकासाखर कारखान्यांनी उत्पादीत केलेल्या इथेनॉलवर कोणतीही प्रक्रीया न करता केंद्र शासन पेट्रोलमध्ये मिसळत आहे. त्या इथेनॉलला प्रति लिटर ४९ रुपये केंद्र शासन देत असून तेच पेट्रोल १०६ रुपये लिटरने ग्राहकांना विक्री होत आहे. एवढी मोठी तफावत केंद्र शासनाने कशासाठी ठेवली आहे. इथेनॉलचे दर वाढविण्यासाठी केंद्र शासनावर साखर कारखानदारांनी दबाव टाकला पाहिजे. यासाठी कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन बंद करावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी