शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: November 4, 2023 18:05 IST

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका

सांगली : येथील दत्त इंडियाचे व्यवस्थापन पैसे मिळविण्यासाठीच इथे आले आहे. शेतकऱ्यांना लुटून वसंतदादा साखर कारखाना चालविण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना गतवर्षीच्या गळीत हंगामास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये हप्ता मिळालाच पाहिजे. मागील गळिताचा हिशोब द्या, अन्यथा कारखाना बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा शनिवारी सकाळी वसगडे (ता. पलूस), नांद्रे कर्नाल मार्गे मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आली. पदयात्रेचे अनेक गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळमध्ये जन आक्रोश पदयात्रेवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. राजू शेट्टी पुढे म्हणाले, कारखानदार नफ्यातील वाटा द्यायला तयार नाहीत. मात्र, गेल्या वर्षीचे ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखरेचा भाव वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांना ज्यादाचे जे पैसे मिळाले आहेत, त्यातील ४०० रुपये आम्ही मागत आहोत. त्यामुळे तत्काळ ४०० रुपये द्यावेत, यंदाचा योग्य दर जाहीर करावा, अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, श्रीपाल चौगुले, अजित लांडे, कुमार पाटील आदी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाकासाखर कारखान्यांनी उत्पादीत केलेल्या इथेनॉलवर कोणतीही प्रक्रीया न करता केंद्र शासन पेट्रोलमध्ये मिसळत आहे. त्या इथेनॉलला प्रति लिटर ४९ रुपये केंद्र शासन देत असून तेच पेट्रोल १०६ रुपये लिटरने ग्राहकांना विक्री होत आहे. एवढी मोठी तफावत केंद्र शासनाने कशासाठी ठेवली आहे. इथेनॉलचे दर वाढविण्यासाठी केंद्र शासनावर साखर कारखानदारांनी दबाव टाकला पाहिजे. यासाठी कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन बंद करावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी