शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:40 IST

Sharad Pawar : खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना एका संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Sharad Pawar ( Marathi News ) : खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत. कवठेएकंद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. "सरकारने वीज फुकट देण्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे आता मोटर बंद करायला कोण जाईल काय? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहनही यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले. 

“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

खासदार शरद पवार म्हणाले, पिढीजात शेती करणारे आपण शेतकरी. एकेकाळी पाण्याची आपल्याकडे कमतरता होती. तेव्हा सांगलीत उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. आपण या क्षेत्रात एकच पीक घेतलं, ते म्हणजे ऊसाच पीक. शेतीला सारख, सारख पाणी दिल्यामुळे आज नाहीतर उद्या त्या शेतीच नुकसान होतं. एकाच पिकाचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत, असंही पवार म्हणाले. 

यावेळी शरद पवार यांनी स्वत:च्या शेतीचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितला. "माझी स्वत:ची २० एकर शेती आहे, ती जमीन आधी क्षारयुक्त होती. त्यामुळे उत्पन्नाची खात्री नव्हती. त्यावेळी ती जमीन मी दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतलं. आम्ही त्यावेळी जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढलं, हे पाणी काढण्यासाठी आम्हाला ४ वर्षे लागली. आज या जमिनीत काही ठिकाणी ऊस, काही ठिकाणी पेरु, काही ठिकाणी चिकू अशी पिक आहेत. आधी त्या शेतातील उत्पादन २० टक्के होतं, आता त्याच शेतातील उत्पादन ६५ टक्केच्या पुढं गेले आहे. हे फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी जी पाऊलं टाकावी लागतात ती टाकली म्हणून हे शक्य झालं, असंही खासदार शरद पवार म्हणाले. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान

"आपण ऊसाच पिक घेतो. मी यावर बोलतो तेव्हा अनेकांना राग येतो, राग येण्यासारखच मी बोलतो. त्याच कारण ऊसाच पिक म्हणजे माझ्या मते आळशाच पिक पिक.रान तयार केलं, त्या ठिकाणी बियाणं आणलं. लागण केली. त्यानंतर पहिली भांगलणी , दुसरी भांगलणी केली. हे सगळ झालं की फक्त तोडणीची तारीख कधी येते एवढचं आपण बघतो. एकदा ऊसाची लागवड केली की नंतर थेट ऊस कारखान्याला घालवायचा, असं सांगत खासदार शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले. "ऊस शेती करुन आम्ही जगाच्या आणि गावच्या राजकारणाची चर्चा करत बसतो. राजकारण करायचं असतं, पण तो आपला धंदा नाही. आपला प्रपंच सांभाळून मग ते करायचं असतं, असंही शरद पवार म्हणाले. 

"क्षारपड जमिनीसाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे. ते खर्चिक आहे, त्या खर्चाची जबाबदारी सरकार ८० टक्के घेते. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे पण अतिरिक्त होता कामा नये. आपल्याकडे नदीकाठ हा काळ्यामातीचा असतो. आपल्याकडे काही लोकांना सवय आहे की, एकदा मोटर चालू केली की परत चार दिवस तिकडे बघतही नाहीत. आता तर सरकारने मोफत वीज झाली आहे, आता मोटर कोण बंद करायला जाणार आहे का? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहनी खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी