शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्जदार हिताय’मुळे जिल्हा बँक आली गोत्यात

By admin | Updated: September 4, 2015 22:25 IST

राजकारण भोवले : जत कारखान्यालाही मुक्तहस्ते कर्ज वाटप--जिल्हा बँक गैरव्यवहार-६

सांगली : जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनी सहकारी साखर कारखानदारीवर प्रचंड कृपादृष्टी दाखविली. कर्जवाटप करताना त्यांनी प्रशासकीय टिपणी, नियम, कर्जदाराची आर्थिक स्थिती याचा कोणताही विचार केला नाही. राज्य सहकारी बँकेला तारण असलेल्या जत येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यात आला. आता कारखान्याच्या ५ कोटी ८६ लाखाच्या थकबाकीला कोणतेही तारण उरलेले नाही. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत तत्कालीन संचालकांनी मुक्तहस्ते कर्जवाटप केले. कार्यालयीन मंजुरी नसताना, तारण मालमत्ता राज्य शासनाकडे असताना आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अशा कारखान्यांना कर्जवाटप करण्याचे धाडस माजी संचालकांनी केले. जत येथील साखर कारखान्याच्याबाबतीत अशीच चूक करण्यात आली. या कारखान्याला राज्य सहकारी बँकेनेही कर्जपुरवठा केला होता. त्यामुळे थकित कर्जासाठी राज्य बँकेने संपूर्ण कारखान्याची मालमत्ता ४७ कोटी ८६ लाखांना विकली. जिल्हा बँकेला त्यांच्या कर्ज थकबाकीपोटी केवळ १ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. उर्वरित १ कोटी ४९ लाखाला आता कोणतेही तारण उरलेले नाही. या कारखान्यास १९ जुलै १९९९ रोजी २ कोटी, ९ सप्टेंबर २00२ रोजी ५0 लाख, २३ नोव्हेंबर २00२ रोजी १ कोटी ५0 लाख मंजूर करून ते वितरित केले. वास्तविक या कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या राज्य बँकेची परवानगी जिल्हा बँकेने घेणे गरजेचे होते. अशी परवानगी न घेताच संचालक मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर कर्जवाटप केले. कर्जास कार्यालयाचीही शिफारस नव्हती. त्यामुळे ४ कोटी ३७ लाखाचे नुकसान जिल्हा बँकेला झाले. एकूण ५ कोटी ८६ लाख रुपयांच्या नुकसानीपोटी जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांना आता जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. विनातारण व कार्यालयाची शिफारस विचारात न घेता नियमांचे बंधन न पाळता साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे संचालकांची ही ‘कर्जदार हिताय’ कृती संचालकांच्याच अंगलट आली आहे. याशिवाय बँकेचेही अशा निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात जतच्या कारखान्याचे हे प्रकरणही तितकेच गंभीर आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी संबंधितांवर ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)यांना ठरविले जबाबदार आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, प्रा. सिकंदर जमादार, मदन पाटील, विजय सगरे, जगन्नाथ म्हस्के, दिनकर पाटील, अमरसिंह नाईक, शिवराम यादव, बी. के. पाटील, महावीर कागवाडे, मंगल शिंदे, मीनाक्षी शिंदे, अनिता वग्याणी आदींना जबाबदार धरण्यात आले आहे.