शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून सांगलीत भाजपमध्ये नाराजी नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:26 IST

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देनीता केळकर यांची उघड टीका : आयात नेत्यांना किंमत, वर्षानुवर्षे प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे दुर्लक्ष

सांगली : भाजप नेत्यांवर जहरी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आयारामांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना झिडकारण्यात आले, अशी टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी केल्याने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

  • जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलून गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची संधी दिल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे पडळकर उमेदवारी देण्याइतपत वरिष्ठ नेत्यांच्या जवळचे कसे झाले? सातत्याने सोयीची भूमिका घेऊन पडळकरांनी राजकारण केले. रासप, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि पुन्हा भाजप असा प्रवास त्यांनी केला. पक्षवाढीसाठी त्यांनी कोणते कार्य केले किंवा भविष्यात त्यांचा कोणत्या माध्यमातून फायदा होणार आहे, हे नेत्यांनी सांगावे.

 

पक्षात मी नवीन असल्याने त्यांची ध्येयधोरणे समजून घेत आहे. विधानपरिषदेसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारपूर्वक भूमिका घेतली असणार. शिवाजीराव देशमुख यांच्या विचारांचा, माझ्या भूमिकेचा योग्य सन्मान राखला जाईल, असे नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात त्यापद्धतीने ते निर्णय घेतील, असा विश्वास आहे.- सत्यजित देशमुख, भाजप नेत

संधी कोणाला, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. असे निर्णय दूरगामी विचार करून धोरणात्मक पद्धतीने घेतले जातात. त्यामुळे त्यावर स्थानिक पातळीवर भाष्य करणे योग्य नाही. कोण किती वर्षे पक्षात काम करीत आहे यापेक्षा पक्षाला सध्याच्या परिस्थितीत कोणता चांगला पर्याय वाटतो व त्याचा पक्षाला कितपत फायदा होईल, ही बाब महत्त्वाची असते.- विलासराव जगताप, माजी आमदार, जत

विधानपरिषदेच्या उमेदवारीचा निर्णय घेताना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केलेला दिसतो. संबंधित मतदारसंघात पक्षाला पोषक वातावरण कसे राहील, याचीही तजवीज केली आहे. पक्षासाठी जे योग्य आहे, त्यापद्धतीने निर्णय झालेला आहे. पक्षात दीर्घकाळ काम केलेले अनेक दिग्गज लोक जिल्ह्यात आहेत. त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळाली असती तरी, अन्य काही नाराज झाले असते. त्यामुळे यातून एक वेगळा निर्णय पक्षाने विचारपूर्वक घेतल्याचे दिसत आहे.- शिवाजीराव नाईक, माजी आमदार

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदSangliसांगलीPoliticsराजकारण