शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

साहित्य शिक्षणातही भेदभाव

By admin | Updated: February 2, 2015 00:13 IST

राजन खान : विट्यात ३३ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन

विटा : लेखकांनी निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिलं पाहिजे. सध्या विद्यापीठातून वेगवेगळे साहित्य शिकवले जाते. त्यात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, मुस्लिम साहित्य असे भेद करून ठेवले आहेत. परंतु, याकडे एकदा लेखक व साहित्य म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. विटा येथे साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठाच्यावतीने आयोजित ३३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान खान यांनी भूषविले. यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील, कवी दयासागर बन्ने, बाळासाहेब पवार, प्रमोद पुजारी, रघुराज मेटकरी, अ‍ॅड. अपर्णा केसकर, प्रा. विश्वनाथ गायकवाड, ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात खान म्हणाले, लेखकांची मंदिरे बांधणारे महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना जातीभेद, कर्मकांड संपविण्यासाठी झाली. परंतु, आज जातीभेद संपला का? लेखकांनीही आज जाती-पातीचं लिहिणं थांबविलं पाहिजे. निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिता आले पाहिजे. जागतिक कीर्तीचे लेखक व्हायचे असेल, तर एकांगी लिहिणे टाळले पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि राज्यकर्त्यांचे सिंचनातील घोटाळे हे आता साहित्यात आले पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, विट्यात गेल्या ३३ वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे विट्याच्या इतिहासात याची नोंद घ्यावी लागेल. ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ निर्माण व्हावी.स्वागत व प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी केले. यावेळी वैशाली कोळेकर, संमेलनास पृथ्वीराज पाटील, तेजस्विनी खान, ‘मुक्तांगण’चे अध्यक्ष विष्णुपंत मंडले, योगेश मेटकरी, स्वाती शिंदे-पवार, शिवराम पाटील, दीपाली गुजले, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, अरूण लंगोटे, गंगाधर लकडे, प्रदीप पाटील, श्रीकांत माने, दयानंद बनसोडे, वसंत पाटील, बाळकृष्ण चव्हाण, नवोदित लेखक, कवी उपस्थित होते. आभार अभिजित निरगुडे यांनी मानले. (वार्ताहर) टीव्हीचे अतिक्रमण पतंगराव कदम म्हणाले, साहित्यात मोठी ताकद आहे. नवोदित लेखकांनी व तरूणांनी लोकांना अभिप्रेत साहित्याची निर्मिती केली पाहिजे. सध्या टीव्ही माध्यमाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तरूण मुले सुसंस्कृत होण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची गरज आहे.