शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतीपंपासाठी नवीन वीजकनेक्शन देणे बंद : शेतकरी वर्गातून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:59 IST

प्रताप महाडिक । कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद ...

ठळक मुद्देमहावितरणचा अजब कारभार

प्रताप महाडिक ।कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदून पाईपलाईन केल्या आहेत, परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याला महावितरणचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. महावितरणने नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. यामुळे कर्जबाजारी झालेले हजारो शेतकरी देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.शासनाने वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय ठेवला आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी सौरप्रणाली नको, आम्हाला महावितरणकडून वीज कनेक्शन हवे, अशी मागणी केली आहे.

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत, त्यामधील ज्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत, त्या शेतकºयांना आता नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली ‘एचव्हीडीएस’अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकºयांसाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा वर्षांपासून पैसे भरले आहेत, त्यांना अद्यापही बरीच जोडणी बाकी असल्याने शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली, निवेदन देण्यात आली; मात्र महावितरण कंपनीने उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधा, उपलब्ध वीज आणि लागणारी वीज आणि महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीसाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे कारण दाखवून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे, असे अधिकारी सांगत आहेत.शासनाने यापुढे सौरऊर्जेवर भर देण्याचे ठरवल्याने यापुढे आता सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचा वापरही नियंत्रणात राहील, असे सांगितले जाते. परंतु तलावांमध्ये पाणीपातळी कमी-जास्त होत असल्यामुळे पाणी उचलण्याचे परवाने घेऊन ज्यांनी पाईपलाईन केली आहे, त्या शेतकºयांना एकाच ठिकाणी स्थिर राहणारी सौर कृषी पंप प्रणाली बसविणे अडचणीचे होणार आहे. शासनाने सौर कृषी पंप आणि पारंपरिक वीज कनेक्शन दोन्ही पर्याय शेतकºयांसमोर ठेवले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकºयांची गळचेपी : थांबवावीगेल्या वर्षापासून शेतकºयांना नवीन वीज जोडणीसाठी प्रस्ताव घेण्याचे काम बंद आहे. शासनाने आता सौरऊर्जेबाबत कार्यवाही सुरू केली. २०१८ पूर्वीच्या मंजूर प्रकरणांसाठी उच्चदाब विद्युत प्रणालीतून शेतकºयांना थेट जोडणी देण्याचा निर्णयही झाला, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाने शेतकºयांची गळचेपी थांबवाबी, असे कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरण