शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतीपंपासाठी नवीन वीजकनेक्शन देणे बंद : शेतकरी वर्गातून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:59 IST

प्रताप महाडिक । कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद ...

ठळक मुद्देमहावितरणचा अजब कारभार

प्रताप महाडिक ।कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदून पाईपलाईन केल्या आहेत, परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याला महावितरणचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. महावितरणने नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. यामुळे कर्जबाजारी झालेले हजारो शेतकरी देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.शासनाने वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय ठेवला आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी सौरप्रणाली नको, आम्हाला महावितरणकडून वीज कनेक्शन हवे, अशी मागणी केली आहे.

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत, त्यामधील ज्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत, त्या शेतकºयांना आता नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली ‘एचव्हीडीएस’अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकºयांसाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा वर्षांपासून पैसे भरले आहेत, त्यांना अद्यापही बरीच जोडणी बाकी असल्याने शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली, निवेदन देण्यात आली; मात्र महावितरण कंपनीने उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधा, उपलब्ध वीज आणि लागणारी वीज आणि महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीसाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे कारण दाखवून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे, असे अधिकारी सांगत आहेत.शासनाने यापुढे सौरऊर्जेवर भर देण्याचे ठरवल्याने यापुढे आता सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचा वापरही नियंत्रणात राहील, असे सांगितले जाते. परंतु तलावांमध्ये पाणीपातळी कमी-जास्त होत असल्यामुळे पाणी उचलण्याचे परवाने घेऊन ज्यांनी पाईपलाईन केली आहे, त्या शेतकºयांना एकाच ठिकाणी स्थिर राहणारी सौर कृषी पंप प्रणाली बसविणे अडचणीचे होणार आहे. शासनाने सौर कृषी पंप आणि पारंपरिक वीज कनेक्शन दोन्ही पर्याय शेतकºयांसमोर ठेवले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकºयांची गळचेपी : थांबवावीगेल्या वर्षापासून शेतकºयांना नवीन वीज जोडणीसाठी प्रस्ताव घेण्याचे काम बंद आहे. शासनाने आता सौरऊर्जेबाबत कार्यवाही सुरू केली. २०१८ पूर्वीच्या मंजूर प्रकरणांसाठी उच्चदाब विद्युत प्रणालीतून शेतकºयांना थेट जोडणी देण्याचा निर्णयही झाला, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाने शेतकºयांची गळचेपी थांबवाबी, असे कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरण