शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतीपंपासाठी नवीन वीजकनेक्शन देणे बंद : शेतकरी वर्गातून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:59 IST

प्रताप महाडिक । कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद ...

ठळक मुद्देमहावितरणचा अजब कारभार

प्रताप महाडिक ।कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदून पाईपलाईन केल्या आहेत, परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याला महावितरणचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. महावितरणने नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. यामुळे कर्जबाजारी झालेले हजारो शेतकरी देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.शासनाने वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय ठेवला आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी सौरप्रणाली नको, आम्हाला महावितरणकडून वीज कनेक्शन हवे, अशी मागणी केली आहे.

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत, त्यामधील ज्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत, त्या शेतकºयांना आता नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली ‘एचव्हीडीएस’अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकºयांसाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा वर्षांपासून पैसे भरले आहेत, त्यांना अद्यापही बरीच जोडणी बाकी असल्याने शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली, निवेदन देण्यात आली; मात्र महावितरण कंपनीने उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधा, उपलब्ध वीज आणि लागणारी वीज आणि महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीसाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे कारण दाखवून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे, असे अधिकारी सांगत आहेत.शासनाने यापुढे सौरऊर्जेवर भर देण्याचे ठरवल्याने यापुढे आता सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचा वापरही नियंत्रणात राहील, असे सांगितले जाते. परंतु तलावांमध्ये पाणीपातळी कमी-जास्त होत असल्यामुळे पाणी उचलण्याचे परवाने घेऊन ज्यांनी पाईपलाईन केली आहे, त्या शेतकºयांना एकाच ठिकाणी स्थिर राहणारी सौर कृषी पंप प्रणाली बसविणे अडचणीचे होणार आहे. शासनाने सौर कृषी पंप आणि पारंपरिक वीज कनेक्शन दोन्ही पर्याय शेतकºयांसमोर ठेवले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकºयांची गळचेपी : थांबवावीगेल्या वर्षापासून शेतकºयांना नवीन वीज जोडणीसाठी प्रस्ताव घेण्याचे काम बंद आहे. शासनाने आता सौरऊर्जेबाबत कार्यवाही सुरू केली. २०१८ पूर्वीच्या मंजूर प्रकरणांसाठी उच्चदाब विद्युत प्रणालीतून शेतकºयांना थेट जोडणी देण्याचा निर्णयही झाला, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाने शेतकºयांची गळचेपी थांबवाबी, असे कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरण