शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले; अजब फेऱ्यांनी विद्यार्थी, पालक चक्रावले

By अविनाश कोळी | Updated: September 6, 2023 18:03 IST

एमबीबीएसचा पहिला पर्याय संपल्यानंतर आयुर्वेद, बीडीएस, बीएचएमएस असे पर्याय विद्यार्थ्यांकडून स्वीकारले जातात

अविनाश कोळीसांगली : गुणांच्या आधारे एमबीबीएसचा पहिला पर्याय संपल्यानंतर आयुर्वेद, बीडीएस, बीएचएमएस असे पर्याय विद्यार्थ्यांकडून स्वीकारले जातात. मात्र, आयुर्वेदाच्या अगोदर बीडीएसची प्रक्रिया संपुष्टात येणार असल्याने विद्यार्थ्यांकडे गुणानुसार असलेले पर्यायी अभ्यासक्रमांचे दोर कापले गेले गेले आहेत. अशा अजब फेऱ्यांमुळे विद्यार्थी-पालक चक्रावून गेले आहेत.सीईटी सेलमार्फत एम.बी.बी.एस. आणि बी.डी.एस. अभ्यासक्रमाच्या दोन प्रवेश फेऱ्या पार पडल्या असून तिसरी प्रवेश फेरी ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १५ सप्टेंबरला निवड यादी घोषित होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. या फेरीत प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्दही करता येणार नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंतच प्रवेश रद्द करता येणार आहे.दरम्यान, आयुष अभ्यासक्रमांची खासगी महाविद्यालयांसाठीची १५ टक्के केंद्रीय प्रवेश फेरीची पहिली निवड यादी १३ सप्टेंबरला घोषित होणार असून ८५ टक्के राज्य कोट्यासाठीची पहिल्या फेरीची निवड यादी १४ सप्टेंबरला घोषित होणार आहे. बीडीएसला प्रवेश घेतलेल्या, पण आयुष अभ्यासक्रमांना इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक अत्यंत अडचणीचे आहे. आयुषची निवड यादी घोषित होण्यापूर्वीच बीडीएसला घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नसल्यामुळे ज्यांनी बीडीएसला प्रवेश घेऊन ठेवलेला आहे असे विद्यार्थी आयुषच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत.

त्याचप्रमाणे बीडीएसच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयुषच्या दुसऱ्या फेरीतही सहभागी होता येणार नाही. त्यांना मिळालेला प्रवेश रद्द करता येणार नाही. त्यामुळे आयुषला प्रवेश मिळाला नाही तर बीडीएसचा प्रवेश घेण्याची मानसिकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक अडचणीचे ठरले आहे. आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा त्यांचा मार्गच बंद झालेला आहे.

नीट परीक्षेत २५० ते ३५० गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेद शाखेत प्रवेश न मिळाल्यास दंत वैद्यकीय शाखेला प्रवेश घ्यायचा असतो. सीईटी सेलच्या वेळापत्रकामुळे आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास, दंत वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना अवघड होणार आहे. दंत वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला नाही आणि आयुर्वेद शाखेला प्रवेश मिळाला नाही तर काय करायचे, हासुद्धा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे बीडीएस की बीएएमएस प्रवेशाचा निर्णय विद्यार्थ्यांना आधीच घ्यावा लागणार आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी