शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गटबाजीच्या धावपट्टीवरून सांगलीतील भाजप नेत्यांचे विमानोड्डाण, पालकमंत्र्यांची वेगळीच वाट

By अविनाश कोळी | Updated: March 1, 2023 12:09 IST

गटबाजीच्या अशा खडबडीत धावपट्टीवरून जिल्ह्याच्या विकासाचे विमान भाजप उडविणार तरी कसे?

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यात गटबाजीने भाजपची धावपट्टी विखुरली गेली आहे. याचा सबळ पुरावाच देत भाजपच्या दोन गटांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विमानतळप्रश्नी वेगवेगळी निवेदने दिली. गटबाजीच्या अशा खडबडीत धावपट्टीवरून जिल्ह्याच्या विकासाचे विमान भाजप उडविणार तरी कसे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारावे म्हणून गेले काही महिने विविध पक्ष, संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूरप्रमाणे सार्वजनिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित ताकद लावावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत असले तरी सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट पडल्याने या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्या आहेत.

विमानतळाच्या प्रश्नावर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातच निवेदन दिले. त्याचवेळी सांगलीतील आमदार गटातील पदाधिकाऱ्यांनी विमानतळाच्याच प्रश्नावर वेगळे निवेदन सिंधिया यांना दिले. एकाच प्रश्नावर दोन वेगवेगळे गट वेगवेगळी निवेदने घेऊन मंत्र्यांना भेटल्याने सांगलीतील कार्यकर्ते अवाक झाले.भाजपच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भाजपचे नेते वेगवेगळे जाऊन भेटत असतात. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनाही एकाच प्रश्नावर भाजपमधील नेते स्वतंत्रपणे भेटले. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. विकासकामांवर या सर्व मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांचे गाठोडे बांधून या नेत्यांनी ठेवले आहे. प्रश्नांची जंत्री आहे तशीच आहे.

पालकमंत्र्यांची वेगळीच वाटपालकमंत्री सुरेश खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची अशीच स्वतंत्र भेट घेतली व येथील काही मागण्यांचे निवेदन दिले. आ. सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पेठ-सांगली रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचा आग्रह धरला होता. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी गडकरी यांची भेट घेऊन निधीच्या घोषणेचा गवगवा केला.

इतका आटापिटा कशासाठी?भाजपचे दोन आमदार व एक खासदार यांच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी ताकद लावत आहे, पण पदरात काहीही पडत नाही. भाजपच्या नेत्यांची एकमेकांशी स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसते. एकत्रित बैठकाही घेत नाहीत. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेते, मंत्री आले तर औपचारिकता म्हणून हे सर्व चेहरे एका व्यासपीठावर दिसतात, अन्यथा त्यांना एकत्र करणे मुश्कील आहे. कार्यकर्तेही गटबाजीत विखुरले गेले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळBJPभाजपा