शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कडेगाव तालुक्यात धान्य मिळण्यात ऑनलाइन नोंदीची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:00 IST

ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे . प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४  हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा

ठळक मुद्दे कडेगाव तालुक्यातील चित्र : वंचित केसरी शिधापत्रिका धारकांची व्यथा 

प्रताप महाडिक 

कडेगाव : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असले तरी कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहणार अशी घोषणा शासन आणि प्रशासनाने केली  आहे. सर्व पात्र शिधापत्रिका धारक कुटुंबाना धान्य मिळेल असे बोलले जात आहे.मात्र ऑनलाइन नोंदणी न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही .कडेगाव तालुक्यातील कित्येक केसरी  शिधापत्रिकाधारक ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे वंचित आहेत.

आपल्या  प्रशासनाने  परराज्यातील नागरिकांनाची  धान्य जेवणाची व्यवस्था केली आहे. हे संकटकाळात करणे योग्यच आहे . मात्र कडेगाव तालुक्यातील  कित्येक केसरी शिधापत्रिका धारक असलेल्या नागरिकांना ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याने रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत शासनस्तरावर वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे.

शासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांनी कार्डावर आरसी नंबर घेऊन नोंदणी  केली होती .मात्र अजूनही त्यांची   शासनाच्या  प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन नोंदणीही झालेली नाही. त्यामुळे त्यांना ऐन गरजेच्या वेळी रेशन दुकानात  धान्य मिळाले नाही .संचारबंदी असल्यामुळे  दाद कोणाकडे मागायची हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहून शासनाने सगळीकडे लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे काम बंद झाले. शासनाने लॉक डाऊन केला असला तरी कोणीही अन्नावाचून उपाशी राहणार नाही असे सांगितले आहे. ज्यांच्या शिधापत्रिकाची   ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे .प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४  हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन पद्धतीने  सवलतीच्या दरातच धान्य द्यावे. तसेच जे रेग्युलर केसरी शिधापत्रिका धारक आहेत आणि त्यांचेही ऑनलाईन झाले नाही अशा शिधापत्रिका धारकांना देखील ऑफलाईन ने धान्य द्यावे अशी मागणी होत आहे.ऑफ लाईन नोंद घ्यावी : सतीश मांडके सरपंच शिरसगाव ज्याचे शिधापत्रिकाची   ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ नोंद व्हावी.यामध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर ऑफलाईन पद्धतीने नोंद करावी. अन्यथा  प्रशासनाने या वंचित कुटुंबाना धान्य व  जीवनावश्यक  वस्तूंची किट देऊन त्यांची  समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा .

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन