शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:34 IST

दराची अनिश्चितता, रोगराईत वाढ

सचिन ढोलेसमडोळी : बाजारपेठेतील दराची अनिश्चितता, हवामानातील बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते-औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या पार्श्वभूमीवर मिरज पश्चिम भागात नगदी पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दहा-पंधरा वर्षांपूर्वी समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचीस प्रतिकिलो ५० रुपयांपासून २०० रुपये दर मिळत होता. आवक वाढल्यास तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तथापि अलीकडे प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. या भागामध्ये ढबू मिरची खालोखाल टमाटे, वांगी, गवारी, भेंडी ही भाजीपाल्याची नगदी पैसा मिळवून देणारी पिकेही घेतली जातात.सध्या गुंतवणूक व मेहनतीच्या तुलनेत बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने बहुतांशी  शेतकऱ्यांनी रोटावेटर, जेसीबी लावून भाजीपाल्याची पिके नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.ढबू मिरचीचे दर तर खूपच पडले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, हैदराबाद व अन्य राज्यात जाणाऱ्या ढबू मिरचीत घट झाली आहे.कर्जबाजारी होण्याची वेळकोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. पण नगदी पिके असणाऱ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये वाढ झाली होती. त्याचवेळी दळणवळणावर निर्बंध घातले गेल्याने नाशवंत भाजीपाला सडून गेला. त्यानंतर अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसला. दर नसल्याने गुंतवणूक वाया गेली, परिणामी भाजीपाला उत्पादकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी