शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:34 IST

दराची अनिश्चितता, रोगराईत वाढ

सचिन ढोलेसमडोळी : बाजारपेठेतील दराची अनिश्चितता, हवामानातील बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते-औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या पार्श्वभूमीवर मिरज पश्चिम भागात नगदी पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दहा-पंधरा वर्षांपूर्वी समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचीस प्रतिकिलो ५० रुपयांपासून २०० रुपये दर मिळत होता. आवक वाढल्यास तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तथापि अलीकडे प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. या भागामध्ये ढबू मिरची खालोखाल टमाटे, वांगी, गवारी, भेंडी ही भाजीपाल्याची नगदी पैसा मिळवून देणारी पिकेही घेतली जातात.सध्या गुंतवणूक व मेहनतीच्या तुलनेत बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने बहुतांशी  शेतकऱ्यांनी रोटावेटर, जेसीबी लावून भाजीपाल्याची पिके नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.ढबू मिरचीचे दर तर खूपच पडले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, हैदराबाद व अन्य राज्यात जाणाऱ्या ढबू मिरचीत घट झाली आहे.कर्जबाजारी होण्याची वेळकोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. पण नगदी पिके असणाऱ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये वाढ झाली होती. त्याचवेळी दळणवळणावर निर्बंध घातले गेल्याने नाशवंत भाजीपाला सडून गेला. त्यानंतर अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसला. दर नसल्याने गुंतवणूक वाया गेली, परिणामी भाजीपाला उत्पादकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी