शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित करावे : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:43 IST

कृषि विषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित करावे : डॉ. अभिजीत चौधरीआत्माअंतर्गत जिल्हा नियामक मंडळाची सभा संपन्न

सांगली : कृषि विषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा नियामक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस. जी. फाळके आदि अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कृषि उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करता यावी, यासाठी शेतकऱ्यांना दिशा मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सांगली जिल्ह्याची पीकपरिस्थिती आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गरज ओळखून मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकमाहिती, कीडनियंत्रण, प्रशिक्षण, यशकथा यांची माहिती मिळणे शक्य होईल. तसेच, शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होईल. हे ॲप युझर फ्रेंडली असावे, जेणेकरून ते ग्रामीण भागातील व सामान्य शेतकऱ्यांनाही वापरता येईल, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे व प्रबोधन करावे. तसेच, सेंद्रिय शेतीमाल विकण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या सेंद्रिय जत्रा या मॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. ई मार्केटिंग, होम डिलिव्हरी आदिंबाबत तसेच, स्थानिक मॉलमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी समन्वय साधावा, असे त्यांनी सूचित केले.तसेच, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी नवीन शेतीप्रयोगांकडे वळण्यासाठी अनुषंगिक मार्गदर्शन करावे. जिल्हांतर्गत भेटीवेळी अशा यशस्वी प्रयोगांना आवर्जून भेटी द्याव्यात, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आगामी वर्षाचे नियोजन करताना प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या गटाशी जोडला जाईल, याची दक्षता घ्या. यासाठी कृषि व मत्स्य, रेशीम विकास, पशुसंवर्धन आदि कृषिपूरक सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

सक्रिय शेतकरी निवडून त्यांना विविध कृषिविषयक योजनांचा लाभ दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अन्य अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य करा. तसेच, कृषि व फळ प्रक्रियेवरही भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या फळबाग वाचवा अभियान ही घडीपत्रिका, रोपाद्वारे ऊस लागवडीतून शाश्वत ऊस उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांची शेतीशाळा माहितीपुस्तिका यांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, इस्लामपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा कृषि महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याबाबत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत व सादरीकरण बसवराज मास्तोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोेडे यांनी केले. सर्जेराव फाळके यांनी आभार मानले. यावेळी कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली