शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

लोकसभा निवडणूक पूर्वरंग: आणीबाणीने सत्ता गेली, तरी सांगलीत काँग्रेसच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:27 IST

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. ...

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. पाठोपाठ बांगलादेश मुक्तीमध्ये इंदिरा गांधी यांनी मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. मात्र, बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामुळे देशात महागाई भडकली होती.

१९७१ ते १९७४ या तीन-चार वर्षांच्या काळातच देशातील वातावरण पलटून गेले. लोकांमधील या असंतोषाची ठिणगी गुजरातमध्ये पडली. भारतात धुसफुसत असलेल्या असंतोषाचे प्रतीक बनून नवनिर्माण चळवळ पेटली. पुढे १९७४ मध्ये बिहारमध्ये जयप्रकाश नारायण प्रणीत संपूर्ण क्रांतीची चळवळ सुरु झाली. १८ मार्च १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला. तेव्हा झालेल्या पोलिस कारवाईत २७ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळू लागला.गुजरात व बिहार येथे आंदोलने पेटलेली होती. देशभर सरकारविरोधी वातावरण तयार होऊ लागले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल झाला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून पराभूत झालेले समाजवादी नेते राजनारायण यांनी इंदिरा गांधींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. त्यांची निवडणूक रद्द केली जावी, अशी याचिका दाखल केली होती.१२ जून १९७५ रोजी न्यायालयाने निर्णय जाहीर केला व त्यात इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली गेली. न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंदिराविरोधी मोहिमेला आणखीच जोर चढला व त्यांनी इंदिराजींचा राजीनामा मागितला. त्यामुळे अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २५ जून १९७५ रोजी न्यायाधीश व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून काम करू शकतात. मात्र, लोकसभा सदस्य म्हणून सभागृहाच्या कामकाजात व मतदानात त्यांना भाग घेता येणार नाही, असा निर्णय दिला.दरम्यान, देशाअंतर्गत असुरक्षितता आणि बंडाळी हे कारण देऊन २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी घटनेच्या कलम ३५२ अंतर्गत देशात आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात घातले. तसेच वृत्तपत्रे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच केला. जनतेमध्ये अंतर्गत मोठा असंतोष होता. परंतु वरवर सर्व परिस्थिती आलबेल दिसत होती. परिणामी इंदिरा गांधी यांनी १८ जानेवारी १९७७ रोजी आणीबाणी शिथिल केली. पाचवी लोकसभा बरखास्त करण्याची घोषणा केली.

संयुक्त जनता पक्षाची स्थापना..लोकसभा बारखास्तीच्या घोषणेनंतर त्वरितच संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या पक्षांनी आपल्या चार पक्षांचे विलीनीकरण करून संयुक्त अशा जनता पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही भारतीय लोकदलाचे 'नांगरधारी शेतकरी' हेच निवडणूक चिन्ह जनता पक्षाने स्वीकारले.

इंदिराजींचा पराभव, मोरारजी पंतप्रधान..१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत ४६-सांगली मतदारसंघातून गणपती तुकाराम गोटखिंडे काँग्रेस यांना १,९२,१२५ मते मिळून विजयी झाले. तर जनता पक्षाचे वासुदेव दाजी जाधव यांना १,३५,८३१ मते मिळाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत आणीबाणीमुळे देशातील नागरी हक्क व लोकांचे स्वातंत्र्य स्थगित झाल्यामुळे केंद्र सरकार व इंदिरा गांधींना रोष पत्करावा लागला. इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले.

- ॲड. बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधिज्ञ, विटा.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस