शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

लोकसभा निवडणूक पूर्वरंग: आणीबाणीने सत्ता गेली, तरी सांगलीत काँग्रेसच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:27 IST

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. ...

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. पाठोपाठ बांगलादेश मुक्तीमध्ये इंदिरा गांधी यांनी मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. मात्र, बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामुळे देशात महागाई भडकली होती.

१९७१ ते १९७४ या तीन-चार वर्षांच्या काळातच देशातील वातावरण पलटून गेले. लोकांमधील या असंतोषाची ठिणगी गुजरातमध्ये पडली. भारतात धुसफुसत असलेल्या असंतोषाचे प्रतीक बनून नवनिर्माण चळवळ पेटली. पुढे १९७४ मध्ये बिहारमध्ये जयप्रकाश नारायण प्रणीत संपूर्ण क्रांतीची चळवळ सुरु झाली. १८ मार्च १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला. तेव्हा झालेल्या पोलिस कारवाईत २७ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळू लागला.गुजरात व बिहार येथे आंदोलने पेटलेली होती. देशभर सरकारविरोधी वातावरण तयार होऊ लागले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल झाला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून पराभूत झालेले समाजवादी नेते राजनारायण यांनी इंदिरा गांधींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. त्यांची निवडणूक रद्द केली जावी, अशी याचिका दाखल केली होती.१२ जून १९७५ रोजी न्यायालयाने निर्णय जाहीर केला व त्यात इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली गेली. न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंदिराविरोधी मोहिमेला आणखीच जोर चढला व त्यांनी इंदिराजींचा राजीनामा मागितला. त्यामुळे अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २५ जून १९७५ रोजी न्यायाधीश व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून काम करू शकतात. मात्र, लोकसभा सदस्य म्हणून सभागृहाच्या कामकाजात व मतदानात त्यांना भाग घेता येणार नाही, असा निर्णय दिला.दरम्यान, देशाअंतर्गत असुरक्षितता आणि बंडाळी हे कारण देऊन २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी घटनेच्या कलम ३५२ अंतर्गत देशात आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात घातले. तसेच वृत्तपत्रे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच केला. जनतेमध्ये अंतर्गत मोठा असंतोष होता. परंतु वरवर सर्व परिस्थिती आलबेल दिसत होती. परिणामी इंदिरा गांधी यांनी १८ जानेवारी १९७७ रोजी आणीबाणी शिथिल केली. पाचवी लोकसभा बरखास्त करण्याची घोषणा केली.

संयुक्त जनता पक्षाची स्थापना..लोकसभा बारखास्तीच्या घोषणेनंतर त्वरितच संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या पक्षांनी आपल्या चार पक्षांचे विलीनीकरण करून संयुक्त अशा जनता पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही भारतीय लोकदलाचे 'नांगरधारी शेतकरी' हेच निवडणूक चिन्ह जनता पक्षाने स्वीकारले.

इंदिराजींचा पराभव, मोरारजी पंतप्रधान..१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत ४६-सांगली मतदारसंघातून गणपती तुकाराम गोटखिंडे काँग्रेस यांना १,९२,१२५ मते मिळून विजयी झाले. तर जनता पक्षाचे वासुदेव दाजी जाधव यांना १,३५,८३१ मते मिळाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत आणीबाणीमुळे देशातील नागरी हक्क व लोकांचे स्वातंत्र्य स्थगित झाल्यामुळे केंद्र सरकार व इंदिरा गांधींना रोष पत्करावा लागला. इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले.

- ॲड. बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधिज्ञ, विटा.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस