शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बहुरंगी लढतीत दिसणार कदम-देशमुखांचा संघर्ष

By admin | Updated: July 1, 2016 23:35 IST

पलूस - नगरपालिकांचे संभाव्य चित्र

किरण सावंत--  पलूस --नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेमुळे पलूस शहराच्या विकासाला गती येणार आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपरिषदेची पहिली निवडणूक अपेक्षित असली तरी या पहिल्याच निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या नेतेमंडळींनी आतापासूनच तयारी चालविली आहे. पलूस ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूसाहेब येसुगडे व अमरसिंह इनामदार यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने काँग्रेसचा पराभव करून सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघांनीही भाजपचा प्रचार केला. यामुळे यापुढील काळात त्यांच्या आघाडीला कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. पलूसची यशवंत पाणीपुरवठा संस्था सुरू केल्याने शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले, सुहास पुदाले, पंचायत समितीचे उपसभापती सुहास पुदाले, माजी समाजकल्याण सभापती खाशाबा दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल यांनीही शहराच्या विकासात सक्रिय हातभार लावला आहे. यामुळे पलूसमधील मतदार हा काँग्रेसच्याच पाठीशी राहणार, या ठाम विश्वासातून काँग्रेसची नेतेमंडळी नगरपरिषदेत पहिली सत्ता आपलीच असली पाहिजे, या ईर्षेने तयारीला लागली आहेत. याउलट राज्यात आणि देशात असलेल्या भाजपच्या सत्तेचे मार्केटिंग करीत स्थानिक पातळीवरही पलूस नगरपरिषदेत आपलीच सत्ता कायम करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब येसुगडे, अमरसिंह फडनाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे.पृथ्वीराज देशमुख राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सध्या राष्ट्रवादीची ताकद मर्यादित राहिली आहे. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड वगळता सक्षम नेतृत्व राष्ट्रवादीकडे नाही. तालुकाध्यक्ष मारूती चव्हाण कार्यकर्त्यांची बांधणी करीत असले तरी राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, की काँग्रेसबरोबर आघाडी करणार, याबाबत पक्ष देईल तो निर्णय विीकारणार असल्याचे सांगत आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची नेतेमंडळी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करीत आहेत. पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार, हे कार्यकर्त्यांमध्ये बिंबविले जात आहे. या साऱ्या रणधुमाळीत शिवसेनेचे लालासाहेब गोंदिल, प्रशांत लेंगरे, शेतकरी संघटनेचे पोपटराव भोरे यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे. यामुळे बहुरंगी ठरणाऱ्या या निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदार संघातील कदम-देशमुख संघर्षाचेच प्रतिबिंब नगरपरिषदेत उमटणार, हे स्पष्ट आहे. पहिल्या नगराध्यक्षाचा मान कोणाला?नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याच्या शासनाच्या निर्णयाची पलूस नगरपरिषद निवडणुकीत अंमलबजावणी होणार आहे. प्रभाग आरक्षण, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, सत्तेचा कौल, अशा अनेक बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. यामुळे शहराचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार, याची कमालीची उत्सुकता असणार आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाचा वाढता विस्तार लक्षात घेऊन १६ मार्च २०१६ रोजी पलूस नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार पाहता शहरीकरण आणि विकास कामांना ग्रामपंचायतीमुळे मर्यादा येत होत्या. आता नगरपरिषदेच्या स्थापनेमुळे शहराचा नियोजनपूर्वक विकास व विस्तार करणे शक्य होणार आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे नगरपरिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कदम-देशमुख संघर्षनगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीची सत्ता संपुष्टात येऊन प्रशासन नेमण्यात आले. ग्रामपंचायतीवर बापूसाहेब येसुगडे व अमरसिंह इनामदारप्रणित स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता होती. एकूण १७ सदस्यांपैकी ११ सदस्य स्वाभिमानी संघटनेचे, तर विरोधी काँग्रेसचे ६ सदस्य होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, आघाड्यांचे नेते स्वतंत्रपणे बैठका घेऊन आपली ताकद अजमावत आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रभागरचना महत्त्वाची ठरणार आहे. सध्या गावभाग, गोंदिलवाडी, कृषीनगर, पलूस कॉलनी, विद्यानगर, शिवदत्त कॉलनी, शिवाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना जमवून रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू असतात.