कारागिरांना मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:04+5:302021-05-28T04:20:04+5:30
संचारबंदीमुळे नृत्य कलाकारांचे हाल सांगली : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पाहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची ...

कारागिरांना मदत देण्याची मागणी
संचारबंदीमुळे नृत्य कलाकारांचे हाल
सांगली : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पाहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची आशा पल्लवित झाल्या असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे अनेकांची परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत नृत्य कलाकारांचे हाल होत असून त्यांना कुणाकडूनही मदत होत नाही.
अवैध गुटखा विक्री सुरूच
सांगली : काेराेना संक्रमण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही सांगलीत काही पानपट्टी चालकांकडून छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे़
बैलांद्वारे नांगरणी झाली दुर्मीळ
सांगली : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.
घरचे साेयाबीन बियाणे वापरा
सांगली : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हमालांवर उपासमारीची वेळ
सांगली : संपूर्ण दिवसभर पाठीवर ओझे वाहून चार पैसे कमावणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे काम मिळत नसल्याने हातावर पोट असलेला हा कष्टकरी वर्ग अर्धपोटी राहून दिवस काढत आहे. राज्यभरातील सव्वालाख हमालांची आज आर्थिक कोंडी झाली आहे. कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा, याची चिंता त्यांना सतावत आहे.
करवसुलीवर परिणाम
सांगली : महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींचा बहुतांश कारभार दरवर्षी गोळा होणाऱ्या करामधूनच चालतो. मात्र, कोरोना संकटामुळे करवसुली थांबली. याचा शहर विकासावर परिणाम हाेईल.
बांधबंदिस्तीच्या कामांना वेग
करगणी : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पाणलोट विकास योजनेंतर्गत शेतशिवारांमध्ये बांधबंदिस्तीची कामे सध्या वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे.