शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कोयनेतून विसर्ग कमी केल्याने कृष्णेची पातळी घटणार

By अशोक डोंबाळे | Updated: June 10, 2023 17:48 IST

जलसंपदाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सांगली : कोयना धरणामध्ये सध्या केवळ १२.६३ टीएमसी म्हणजे १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणून कोयना धरण प्रशासनाने धरणातील विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी होणार आहे. पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा कमी होणार असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.सध्या पाऊस लांबला असून, धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण ताकारी, टेंभू उपसा सिंचन योजना आणि नदीकाठच्या मोठ्या सिंचन योजना, पिण्यासाठी आठवड्याला एक टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. पाऊस खूपच लांबला तर धरणातील पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच आहे. म्हणून मान्सून पावसाचा जोर वाढेपर्यंत कोयनेतील पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. म्हणूनच कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी सध्या कमी केले आहे. केवळ एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी प्रचंड कमी होणार आहे.महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे : ज्योती देवकरपावसाळा लांबल्यामुळे व काही तांत्रिक कारणांमुळे कोयना धरणातून पुढील ४ ते ५ दिवस केवळ १०५० क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. यामुळे कृष्णा नदीवरील खाजगी उपसा व टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनादेखील सुरू आहेत. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी पुढील काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने सांगली शहरातील पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे पत्र सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महापालिकेला पाठविले आहे.कमी पाण्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्नकृष्णा नदीत सध्या खूपच कमी पाणीसाठा असल्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. पाण्याला वास येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी दक्षता घ्यावी, प्रसंगी उकळूनच घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीriverनदी