शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी डिसेंबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:57 IST

राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही.

ठळक मुद्देयोजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

आटपाडी : राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टÑाच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. दुष्काळी भागातील योजनांचे प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत ९० टक्के पूर्ण करा अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही. जे-जे करावे लागेल ते करून या सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी दिला.

येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेल्या शेतमजूर, शेतकरी-कष्टकरी संघटनेच्यावतीने २७ वी पाणी परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ. देशमुख म्हणाले, परिषदेमध्ये आज जे ठराव केले आहेत, त्या सर्व ठरावांची तातडीने अंमलबजावणी करावी. यासाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींना एकत्र करू. त्या-त्या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ६० वर्षांच्या काळात नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही आयुष्यभर दुष्काळ भोगला; पण पुढच्या पिढीच्या वाट्याला तरी ही परिस्थिती येऊ नये, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

परिषदेचे निमंत्रक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णांनी दुष्काळी भागात पाणी येऊ शकते, त्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले. तेव्हा काही मंडळींना हे दिवास्वप्न वाटले होते; पण जनतेच्या रेट्यामुळे दुष्काळी भागात पाणी आले. ८ जून हुन्नुरला विभागीय पाणी परिषद घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे १६ पंप सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ६ पंपच सुरू असतात. टेंभूचे अधिकारी म्हणतात, आम्ही दोन महिन्याला आवर्तन देऊ शकतो. मग कुठे अडले आहे? वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे. यावेळी प्रा. बाळासाहेब नायकवडी, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. बाबासाहेब बागवान, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. स्मृतिका लवटे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांची भाषणे झाली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईStrikeसंपSangliसांगली