शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

सिंचन प्रकल्पांसाठी डिसेंबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:57 IST

राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही.

ठळक मुद्देयोजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

आटपाडी : राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टÑाच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. दुष्काळी भागातील योजनांचे प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत ९० टक्के पूर्ण करा अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही. जे-जे करावे लागेल ते करून या सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार गणपतराव देशमुख यांनी दिला.

येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेल्या शेतमजूर, शेतकरी-कष्टकरी संघटनेच्यावतीने २७ वी पाणी परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ. देशमुख म्हणाले, परिषदेमध्ये आज जे ठराव केले आहेत, त्या सर्व ठरावांची तातडीने अंमलबजावणी करावी. यासाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींना एकत्र करू. त्या-त्या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ६० वर्षांच्या काळात नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही आयुष्यभर दुष्काळ भोगला; पण पुढच्या पिढीच्या वाट्याला तरी ही परिस्थिती येऊ नये, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

परिषदेचे निमंत्रक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी म्हणाले, नागनाथअण्णांनी दुष्काळी भागात पाणी येऊ शकते, त्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले. तेव्हा काही मंडळींना हे दिवास्वप्न वाटले होते; पण जनतेच्या रेट्यामुळे दुष्काळी भागात पाणी आले. ८ जून हुन्नुरला विभागीय पाणी परिषद घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी जनमताचा रेटा महत्त्वाचा आहे. सिंचनाची कामे तात्काळ पूर्ण करणे गरजेची आहेत.

माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे १६ पंप सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ६ पंपच सुरू असतात. टेंभूचे अधिकारी म्हणतात, आम्ही दोन महिन्याला आवर्तन देऊ शकतो. मग कुठे अडले आहे? वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे. यावेळी प्रा. बाळासाहेब नायकवडी, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. बाबासाहेब बागवान, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. स्मृतिका लवटे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांची भाषणे झाली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईStrikeसंपSangliसांगली