शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत फराळामध्ये भेसळीचा धोकादायक डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:38 IST

या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

ठळक मुद्देमिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

शरद जाधव ।सांगली : भारत वर्षातील सर्वात मोठा आणि कुटुंबामध्ये आनंद घेऊन  येणारा सण म्हणजे दिवाळी. लक्ष- लक्ष दिव्यांनी उजळून टाकणाºया या सणाचे प्रमुख आकर्षण असते ते फराळाचे पदार्थ. मात्र, या पदार्थांमध्ये भेसळ करत भेसळखोरांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविला आहे. दिसायला आकर्षक वाटणाºया तयार फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार होत असून, फराळाची तयारी करताना जागरूकता आवश्यक आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर कारवाई सुरू केली असून, ऐन दिवाळीतही त्यांची करडी नजर असणार आहे. बाजारपेठेत दिवाळीसाठी फराळाच्या पदार्थांनाही मागणी असते. सध्या घरात फराळाचे पदार्थ तयार करण्यापेक्षा विकतचे पदार्थ विकत आणण्यावर भर दिला जातो. मात्र, काही नामांकित मिठाई दुकानदारांचा अपवाद वगळता,   अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाईच नागरिकांच्या माथी मारली जात आहे. आकर्षक पॅकिंग आणि रंगामुळे नागरिकांनाही, आपण भेसळ असलेली मिठाई घेतल्याचे कळतही नाही; पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, अपचन, त्वचेचे विकार सुरू झाल्यानंतर मग भेसळीचा प्रकार समोर येतो.

मिठाईच्या पदार्थांमध्ये विशेषत: दुधापासून बनविलेली मिठाई, बेसनपासून बनविण्यात येणाºया पदार्थांमध्ये भेसळ वाढत आहे. मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

या मिठाईत वापरण्यात येणारा खवा दुधापासूनचा बनवलेला असतो, की बटाट्याचा, याबाबतही साशंकता येत असते. शुध्द तुपात तळलेले पदार्थ म्हणून वनस्पती तेलात तळून दिलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीfraudधोकेबाजी