शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

अभद्र युत्यांचे दळभद्री राजकारण

By admin | Updated: February 1, 2015 00:51 IST

महापौर, उपमहापौर निवडी : विरोधाची औपचारिकता, पडद्याआडून तडजोडी

अविनाश कोळी / सांगलीस्वार्थी हेतूला तत्त्वांचा मुलामा लावून महापालिकेतील सर्वच पक्षाच्या कारभाऱ्यांनी महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने अभद्र युत्यांना जन्म दिला. नावाला विरोधाचे फलक झळकावून पडद्याआड हस्तांदोलन आणि अलिंगन देऊन दळभद्री कारभाराचे दर्शन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केले. महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने घडलेले महापालिकेतील राजकारण आगामी कारभाराचा ‘ट्रेलर’ आहे. महाआघाडीच्या बिघाडीचा चित्रपट गाजताना त्यातील राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि इद्रिस नायकवडी यांच्या संघर्षाची कहाणी आणि त्यांच्या भूमिका राज्यभर गाजल्या. महाआघाडीच्या चित्रपटाचा नंतर तमाशा झाला. नागरिकांनी पुन्हा असा तमाशा नको म्हणून कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता सोपविली. कॉँग्रेसच्या सत्ताकाळाला आता दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. इद्रिस नायकवडी यांच्या भूमिकेने पुन्हा एकदा पक्षांतर्गत संघर्षाची कहाणी सुरू झाली आहे. नायकवडी हे दोन्ही सत्ताकाळात तीच भूमिका बजावत आहेत. त्यांच्याच कृपेने महापौर, उपमहापौर निवडीचे नाट्य रंगले. मिरजेच्या राजकारणाला उतारा म्हणून मिरजेच्याच नगरसेवकांना पाचारण करण्यात आले. निवडीच्या पूर्वसंध्येलाच अभद्र युत्यांच्या चर्चेत रंग भरला. संख्याबळ ४२ चे असताना कॉँग्रेसच्या पारड्यात ५0 मते पडली. आम्ही कोणाकडे पाठिंब्याची मागणीच केली नव्हती, असे कॉँग्रेसचे स्पष्टीकरण म्हणजे स्वाभिमानीवर केलेला एकतर्फी प्रेमाचा आरोपच म्हणावा लागेल. स्वाभिमानी आघाडीने मात्र, एकतर्फी प्रेमाचा इन्कार करीत कॉँग्रेसनेच ‘प्रपोज’ केल्याचे सांगितले. केवळ इतकेच कारण नव्हे, तर विवेक कांबळे यांच्या रूपाने दलित चळवळीतील एक चांगला नेता या पदावर बसत आहे आणि चांगल्या कारभाराच्या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण स्वाभिमानी आघाडीने केले. हे स्पष्टीकरण चतुर राजकारणाचे अंग आहे. स्वाभिमानी प्रेमप्रकरणाला तिसरा अणि चौथाही कोन आहे, ही चौकोनीय प्रेमकथा महापालिकेत चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांच्या गैरहजर राहण्यामागे आणि सहयोगी सदस्य असणाऱ्या दोघा नगरसेवकांच्या तटस्थतेमागेही कॉँग्रेसप्रेमाचेच गणित असल्याचे सांगण्यात येते. ‘भाजप हा नेहमीच कॉँग्रेसच्या विरोधात काम करणारा पक्ष असल्याने आम्ही तटस्थ राहिलो’, असा आव भाजप नगरसेवकांनी आणला. विरोधक म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली असती, तर विधानसभेच्या मदतीचा पैरा त्यांना फेडता आला असता. पण यावेळी त्यांना कॉँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचेही वावडे वाटले. तटस्थ राहणे म्हणजे युद्धापासून दूर राहणे असाच होतो. संख्याबळ नाही म्हणून माघार घेणे आणि कमी संख्याबळावरही लढतीचे कर्तव्य पार पाडणे यात शिष्टाचार कोणता, याबाबत त्यांचा संभ्रम दिसून आला. राष्ट्रवादीने हा शिष्टाचार पार पाडला, मात्र स्वकीयांवरील नियंत्रण त्यांनी कसे गमावले, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच महापालिकेच्या राजकारणातील पुढील साडे तीन वर्षे कशी असतील, याचे संकेत या घडामोडींनी दिले आहेत.