शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:40 IST

लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.

मालगाव : भोसे (ता. मिरज) येथे जाधव मळ्यातील अंकुश जाधव या शेतकऱ्याने संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. शेजारीच सुरू असलेल्या स्टोन क्रशरमधील धुळीमुळे उतरणीला आलेले द्राक्षपीक खराब झाले, त्यामुळे बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दरम्यान, धुळीमुळे तब्बल ८५ एकर क्षेत्रातील शेती संकटात सापडली आहे.भोसे येथे जाधववस्तीलगत क्रशर सुरू आहे. क्रशरचालकाकडून धूळ नियंत्रित केली जात नसल्याने दोन-तीन किलोमीटरमधील परिसर झाकोळून गेला आहे. घरांमध्ये धूळ साचत असून पिके वाया जात आहेत. सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ८५ एकर क्षेत्रांतील शेती चार वर्षांपासून धुळीने माखत आहे. कडधान्य, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांवर धूळ बसल्याने ती जळून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.क्रशर बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचा अखंड लढा सुरू आहे. पंधरा दिवसांत क्रशर बंद झाला नाही, तर कुटुंबासमवेत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी क्रशरची पाहणी करून पंचनामा केला.

शेतकऱ्यांना श्वसनविकारांनी ग्रासलेक्रशरमधून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व परिसरातील रहिवाशांना अनेक श्वसनविकारांनी ग्रासले आहे. चेहऱ्यावर मास्क लावून कामे करावी लागत आहेत. वयोवृद्धांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे.

स्टोन क्रशर सुरु झाल्यापासून शेतीतून रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. पिकांवर धुळीचा थर बसल्याने वाढ खुंटत आहे. फळधारणा बंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पड टाकावी लागत आहे. - अंकुश जाधव, शेतकरी, भोसे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी