शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

Sangli: अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यांतील ४८६७ हेक्टरमधील पिके सडली, कृषी विभागाचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:54 IST

सर्वाधिक नुकसान कोणत्या तालुक्यात.. वाचा सविस्तर 

सांगली : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली १० हजार ५९२ शेतकऱ्यांची चार हजार ८६७ हेक्टर क्षेत्रातील पिके सडली आहेत. यात सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्यात झाले असून, जत, मिरज तालुक्यांत किरकोळ नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानाची ही आकडेवारी जाहीर केली असून, प्रत्यक्षात नुकसानाचे आकडे आणखी मोठे असणार आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून या नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह दुष्काळी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. सलग महिनाभर खरीप हंगामातील आढणीला आलेल्या पिकांत पाणी साचून राहिल्यामुळे सखल भागामधील पिके कुजली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, तासगाव तालुक्यात १० हजार ५२१ शेतकऱ्यांचे सर्वाधिक चार हजार ७५१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील ११ शेतकऱ्यांचे ५.६ हेक्टर आणि जत तालुक्यातील ६० शेतकऱ्यांचे ११० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, खानापूर तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, प्रशासनाने अहवालामध्ये नुकसान दाखवलेले नाही. याबद्दलही या परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय पिकांचे नुकसानतालुका - बाधित शेतकरी - क्षेत्र (हेक्टरमध्ये)मिरज - ११ -  ५.६तासगाव - १०५.२१ - ४७५१जत - ६०  - ११०एकूण - १०५९२ - ४८६७.३०

जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतअतिवृष्टी आणि पुरामुळे शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांची सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिके सडून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात ही पिके पडलीच नाहीत. यातून शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. शासकीय पंचनामे झाले असून, या नुकसानापोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १० कोटी ९० लाख ३०९ रुपयांची मागणी केली आहे. ही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नसताना पुन्हा अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे पलूस, कडेगाव, वाळवा, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजामध्ये या परिसरात काहीच नुकसान नाही, असा अहवाल आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून अहवाल तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल केला पाहिजे. तरंच त्यांना नुकसान दिसणार आहे. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र