शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतर न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे, नितीन कापडणीस : पूरावेळी घर सील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:19 IST

गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.

ठळक मुद्देस्थलांतर न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे नितीन कापडणीस : पूरावेळी घर सील करणार

सांगली : गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.कापडणीस म्हणाले की, गतवर्षी नागरिकांनी २००५ च्या महापूराशी तुलना केली. नागरिकांचा अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे ४३ हजार कुटूंबे व सव्वा लाख लोकांना पुराचा फटका बसला. हजारो कुटूंबे पुरामध्ये अडकले. पाणी पातळी वाढत असताना नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. पण त्याला नागरिकांनी दाद दिली नाही. त्याचा ताणही शासकीय यंत्रणेवर पडला होता. गतवर्षीच्या पुरात अनेक यंत्रणा कमी पडल्या. त्यामुळेच यंदा महापालिकेची यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे.यंदा पूरस्थिती निर्माण झाल्यास २५ फुटापासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आत्मविश्वास न बाळगता प्रशासनाने आवाहन करताच बाहेर पडावे. स्थलांतराला दाद न देणाऱ्या नागरिकाचे घर सील करून लोकांना सक्तीने सुरक्षितस्थळी पोहचवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रसंगी अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गुन्हे दाखल करण्याची वेळ प्रशासनावर येऊ देऊ नये, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfloodपूरSangliसांगली