शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंहगावच्या बारशामध्ये दिसला ऐक्याचा पाळणा! : संजयकाका-घोरपडे एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:27 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले. हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा नेत्यांची गट्टी जमवण्याचा प्रयत्न केला असून, कार्यक्रमात दोघांच्या ऐक्याचा पाळणा हलल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर नरसिंहगाव वसले आहे. साधारण ४६० कुटुंबे आणि २१२५ एवढी लोकसंख्या असलेले हे गाव. १९८६ पासून लांडगेवाडी हे नाव बदलण्यासाठी येथील सर्वच लोक धडपडत होते. अखेर या लढ्याला यावर्षी यश आले आणि गावचे बारसे घालण्याचा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी राजकारण न आणता सर्वच नेत्यांना निमंत्रण दिले. भाजपचे खासदार पाटील, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील, खासदार गटापासून दुरावलेले अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या व महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे ही सगळीच मंडळी येणार म्हटल्यावर तालुक्यात चर्चेला उधाण आले.

नरसिंहगावच्या गावकºयांनी या गावच्या बारशाच्या सोहळ्याला सर्व माहेरवाशिणी, पै-पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना आवर्जून बोलावले होते. गावात सर्व मार्गांवर रांगोळी रेखाटली होती, गुढ्या उभारल्या होत्या. विद्युतरोषणाई करण्यात आली होती. कारण आजवरचे ‘वाडीकर’ आता ‘गावकरी’ होणार होते. याचा आनंद सर्वांच्याच चेहºयावर ओसंडून वाहत होता. सोहळा सुरू झाला.

सुरुवातीला घोरपडे यांचे आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे फटाके फोडून, वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात खा. संजयकाका पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आ. सुमनताई पाटील, मात्र तालुक्यात चर्चेला उधाण नको म्हणून दुपारीच गावात येऊन गावकºयांची भेट घेऊन गेल्या.

सोहळा सुरू झाला, खा. पाटील, घोरपडे यांचा सत्कार झाला. दोघांनीही नरसिंहगावच्या नामकरण कोनशिलेचे अनावरण केले. दोघांच्याहस्ते गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील हे घोरपडे यांना, ‘सरकार, या पुढे, घ्या, करा सत्कार’, असे म्हणत होते. गावचे उपसरपंच अरुण भोसले, प्रशांत कदम, बाळासाहेब कदम, एल. पी. कदम यांनी या दोघांनी भविष्यात एकत्र यावे, यासाठी भाषणातून जणू राजकीय मनोमीलनाचा पाळणाच म्हटला. हे सर्व घडताना अनिता सगरे साक्षीला होत्या.

अखेर कार्यक्रम पार पडला. गावात चूल बंद करण्यात आली होती. बारशाच्या जेवणाचा गावकरी, पाहुणे मंडळींसह सर्वांनीच आस्वाद घेतला. नरसिंहगावच्या बारशाच्या कार्यक्रमानिमित्त खा. पाटील आणि घोरपडे चार वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते आणि एवढ्या दिवसांचा अबोला या आनंद सोहळ्यावेळी सुटल्याचे चित्र होते. दोघांच्या जवळीकतेने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.मनोमीलनाकडे लक्षनरसिंहगावच्या बारशाने अजितराव घोरपडे व खा. संजयकाका पाटील यांच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांत या दोघांचे राजकीय मनोमीलन झाले, तर नवल वाटायला नको. राजकारणात सगळे काही माफ असते, असे आता लोक म्हणत आहेत.‘राजकीय बाळ’ रडू लागले!अलीकडे खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे-सरकार या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या सोहळ्याने मात्र तालुक्यातील राजकारणात उलटापालट होणार की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. सोहळा पार पडला, नरसिंहगाव नामकरणही झाले, दोघांच्या राजकीय एकीचा पाळणाही हलला, पण या पाळण्यात भविष्यातील लोकसभा आणि विधानसभेचे ‘राजकीय बाळ’ रडू लागले आहे, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण