शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नरसिंहगावच्या बारशामध्ये दिसला ऐक्याचा पाळणा! : संजयकाका-घोरपडे एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:27 IST

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले. हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा नेत्यांची गट्टी जमवण्याचा प्रयत्न केला असून, कार्यक्रमात दोघांच्या ऐक्याचा पाळणा हलल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर नरसिंहगाव वसले आहे. साधारण ४६० कुटुंबे आणि २१२५ एवढी लोकसंख्या असलेले हे गाव. १९८६ पासून लांडगेवाडी हे नाव बदलण्यासाठी येथील सर्वच लोक धडपडत होते. अखेर या लढ्याला यावर्षी यश आले आणि गावचे बारसे घालण्याचा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी राजकारण न आणता सर्वच नेत्यांना निमंत्रण दिले. भाजपचे खासदार पाटील, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील, खासदार गटापासून दुरावलेले अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या व महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे ही सगळीच मंडळी येणार म्हटल्यावर तालुक्यात चर्चेला उधाण आले.

नरसिंहगावच्या गावकºयांनी या गावच्या बारशाच्या सोहळ्याला सर्व माहेरवाशिणी, पै-पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना आवर्जून बोलावले होते. गावात सर्व मार्गांवर रांगोळी रेखाटली होती, गुढ्या उभारल्या होत्या. विद्युतरोषणाई करण्यात आली होती. कारण आजवरचे ‘वाडीकर’ आता ‘गावकरी’ होणार होते. याचा आनंद सर्वांच्याच चेहºयावर ओसंडून वाहत होता. सोहळा सुरू झाला.

सुरुवातीला घोरपडे यांचे आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे फटाके फोडून, वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात खा. संजयकाका पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आ. सुमनताई पाटील, मात्र तालुक्यात चर्चेला उधाण नको म्हणून दुपारीच गावात येऊन गावकºयांची भेट घेऊन गेल्या.

सोहळा सुरू झाला, खा. पाटील, घोरपडे यांचा सत्कार झाला. दोघांनीही नरसिंहगावच्या नामकरण कोनशिलेचे अनावरण केले. दोघांच्याहस्ते गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील हे घोरपडे यांना, ‘सरकार, या पुढे, घ्या, करा सत्कार’, असे म्हणत होते. गावचे उपसरपंच अरुण भोसले, प्रशांत कदम, बाळासाहेब कदम, एल. पी. कदम यांनी या दोघांनी भविष्यात एकत्र यावे, यासाठी भाषणातून जणू राजकीय मनोमीलनाचा पाळणाच म्हटला. हे सर्व घडताना अनिता सगरे साक्षीला होत्या.

अखेर कार्यक्रम पार पडला. गावात चूल बंद करण्यात आली होती. बारशाच्या जेवणाचा गावकरी, पाहुणे मंडळींसह सर्वांनीच आस्वाद घेतला. नरसिंहगावच्या बारशाच्या कार्यक्रमानिमित्त खा. पाटील आणि घोरपडे चार वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते आणि एवढ्या दिवसांचा अबोला या आनंद सोहळ्यावेळी सुटल्याचे चित्र होते. दोघांच्या जवळीकतेने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.मनोमीलनाकडे लक्षनरसिंहगावच्या बारशाने अजितराव घोरपडे व खा. संजयकाका पाटील यांच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांत या दोघांचे राजकीय मनोमीलन झाले, तर नवल वाटायला नको. राजकारणात सगळे काही माफ असते, असे आता लोक म्हणत आहेत.‘राजकीय बाळ’ रडू लागले!अलीकडे खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे-सरकार या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या सोहळ्याने मात्र तालुक्यातील राजकारणात उलटापालट होणार की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. सोहळा पार पडला, नरसिंहगाव नामकरणही झाले, दोघांच्या राजकीय एकीचा पाळणाही हलला, पण या पाळण्यात भविष्यातील लोकसभा आणि विधानसभेचे ‘राजकीय बाळ’ रडू लागले आहे, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण