शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लग्नाला वर्ष होण्यापुर्वीच नवदाम्पत्याने संपवले जीवन, कारण अस्पष्ट; सांगलीतील येळावी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:27 IST

घटनेने परिसरात उडाली खळबळ

तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथील राज संजय जाधव (वय २३) आणि त्यांची पत्नी ऋतुजा राज जाधव (वय २०) या नवविवाहित दाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. ऋतुजा आणि राज यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.राज आणि ऋतुजा यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ऋतुजाचे माहेर सावर्डेतर्फे असंडोली (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील आहे. राज यांच्या घरी आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास राज उलट्या करताना आवाज आल्याने घरातील नातेवाईक जागे झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर राज उलट्या करत असल्याचे दिसून आले, तर ऋतुजा निपचित पडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. तिथून तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाले होते.अवघ्या अकरा महिन्यांपूर्वीच राज आणि ऋतुजा यांचा विवाह झाल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास बजरंग थोरात करत आहेत.

येळावीत हळहळराज जाधव निर्व्यसनी व कष्टाळू होता. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येळावी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऋतुजाच्या माहेरचे नातेवाईकदेखील उपस्थित होते. मात्र, दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी