वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार
By Admin | Updated: June 16, 2014 12:14 IST2014-06-16T12:14:00+5:302014-06-16T12:14:00+5:30
वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.

वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार
कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. सत्ताधार्यांनी हा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनीही कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
पाटील म्हणाले, तंटामुक्त समितीच्या बक्षिसात १ लाखाचा भ्रष्टाचार केला असून बक्षीस रकमेचा सरकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी खर्च केला आहे. बर्याच खर्ची पावत्यांवर सरपंच, ग्रामसेवक यांच्या स्वाक्षर्या नाहीत. २0 हजाराचे डिजिटल फलक लावले, परंतु प्रत्यक्षात फलक कुठेच लावले नाहीत. इकोव्हिलेजमध्ये २ लाखाचा भ्रष्टाचार केला असून सौरदिवे खरेदीसाठी अडीच लाखापैकी २५ हजाराच्या पावत्याच नाहीत. याशिवाय तीन वर्षात मोठे दिवे, दिवाबत्ती व खरेदीची बिले नाहीत. झाडांच्या संवर्धनासाठी तब्बल झाडांच्या रकमेइतकाच भांगलण, पाणी घालणे, संरक्षण खर्च दाखवण्यात आला आहे. इकोव्हिलेजमध्ये ९0 टक्के बोगसगिरी आहे.
रस्ता काँक्रिटीकरणावर ९९ हजाराचा खर्च दाखविला असून त्याची प्रशासकीय मंजुरी, मूल्यांकन नाही. राष्ट्रीय पेयजलची बोगस व निकृष्ट कामे असून मुख्य पाईपलाईन दीड फुटाने केली आहे. माहिती अधिकारामध्ये सव्वा कोटीच्या कामांची माहिती केवळ एका पानावर दिली आहे. याचबरोबर पाणी योजनेच्या अध्यक्ष, सचिव निवडी बोगस असून ग्रामसभेद्वारे न करता सोयीस्कर पध्दतीने केल्या आहेत. निवडीमध्ये एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. ही माहिती तीन महिने उशिरा देण्यात आली आहे.
-----
गावाच्या पाणीपट्टीमध्ये हुकूमशाहीने अडीचपट वाढ केली असून ग्रामसभा अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता ती ४00 रुपयांवरुन १ हजार रुपये करण्यात आली आहे. (वार्ताहर) वशी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने सरकारच्या एक नाही तर सर्वच योजनांच्या निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी नियम पायदळी तुडवून लाखोंचा भ्रष्टाचार करणार्यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या १५ दिवसात ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार आहे.
- सुनील पाटील, वशी.