शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

CoronaVirus Lockdown : स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:37 IST

सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

ठळक मुद्दे स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा

सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

किमान पन्नास हजार स्थलांतरित लॉकडाऊन उठण्याची व रस्ते सुरू होण्याची डोळ्यात पाणी आणून वाट पाहत आहेत. हे सर्वजण बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ व कर्नाटकातील आहेत. पैसे, रोजगार किंवा अन्य कोणतेही आमिष रोखू शकत नसल्याचे त्यांच्याशी संवादानंतर स्पष्ट झाले.औद्योगिक वसाहतीतून वीस हजार परप्रांतीय परतण्याच्या तयारीत आहेत. द्राक्षबागा, डाळिंब शेती व बांधकाम क्षेत्रातही वीस हजारहून अधिक स्थलांतरित वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना थांबविण्यासाठी मालकवर्गाचा आटापिटा सुरू आहे. विश्रामबागमध्ये एका बांधकामावर अडकलेल्या पन्नासभर मजुरांची अस्वस्थता सर्व स्थलांतरितांसाठी प्रातिनिधिक ठरावी.उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील दौलतीया गावचे मजूर वर्षभरापासून बांधकामावर आहेत. बांधकाम संपतानाच लॉकडाऊन सुरु झाले. सगळेच अडकून पडले. पत्र्याच्या शेडमध्ये ते दिवस कंठताहेत. सर्वेशकुमार आणि सीमादेवी दांपत्य चार कच्च्याबच्च्यांसह गावी परतण्यासाठी आतुर झालेत. सर्वेशकुमार सेंट्रिंग करतो. काम संपल्याने पगार थांबलाय. जमविलेली पुंजी दीड महिन्यात खर्ची पडली. गावाकडे जाण्यापुरते पैसे ठेवलेत. मालकाने थोडी मदत दिली; पण सहाजणांच्या कुटुंबाला ती कितीशी पुरणार?कानपूरचा राकेशकुमार आठ-दहा मजुरांसोबत आला आहे. मार्चमध्ये काम संपले. लॉकडाऊनमध्ये बसून राहण्याऐवजी जादा कामे अंगावर घेतली. तळपत्या उन्हात राबल्याने सगळ्यांवरच अंथरुणे धरण्याची वेळ आली. तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या औषधोपचारातच पुंजी संपण्याची भीती राकेशकुमारला सतावते आहे.राजस्थानच्या नागौरमधील हनुमंत जाट फरशीची कामे करतो. त्याच्यासह पस्तीस मजूर सांगलीत अडकलेत. मार्चमध्ये बांधकामे सुरू असल्याने निवारा केंद्रांची गरज भासली नाही. आता काम संपल्याने अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली