शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

CoronaVirus Lockdown : स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:37 IST

सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

ठळक मुद्दे स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा

सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

किमान पन्नास हजार स्थलांतरित लॉकडाऊन उठण्याची व रस्ते सुरू होण्याची डोळ्यात पाणी आणून वाट पाहत आहेत. हे सर्वजण बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ व कर्नाटकातील आहेत. पैसे, रोजगार किंवा अन्य कोणतेही आमिष रोखू शकत नसल्याचे त्यांच्याशी संवादानंतर स्पष्ट झाले.औद्योगिक वसाहतीतून वीस हजार परप्रांतीय परतण्याच्या तयारीत आहेत. द्राक्षबागा, डाळिंब शेती व बांधकाम क्षेत्रातही वीस हजारहून अधिक स्थलांतरित वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना थांबविण्यासाठी मालकवर्गाचा आटापिटा सुरू आहे. विश्रामबागमध्ये एका बांधकामावर अडकलेल्या पन्नासभर मजुरांची अस्वस्थता सर्व स्थलांतरितांसाठी प्रातिनिधिक ठरावी.उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील दौलतीया गावचे मजूर वर्षभरापासून बांधकामावर आहेत. बांधकाम संपतानाच लॉकडाऊन सुरु झाले. सगळेच अडकून पडले. पत्र्याच्या शेडमध्ये ते दिवस कंठताहेत. सर्वेशकुमार आणि सीमादेवी दांपत्य चार कच्च्याबच्च्यांसह गावी परतण्यासाठी आतुर झालेत. सर्वेशकुमार सेंट्रिंग करतो. काम संपल्याने पगार थांबलाय. जमविलेली पुंजी दीड महिन्यात खर्ची पडली. गावाकडे जाण्यापुरते पैसे ठेवलेत. मालकाने थोडी मदत दिली; पण सहाजणांच्या कुटुंबाला ती कितीशी पुरणार?कानपूरचा राकेशकुमार आठ-दहा मजुरांसोबत आला आहे. मार्चमध्ये काम संपले. लॉकडाऊनमध्ये बसून राहण्याऐवजी जादा कामे अंगावर घेतली. तळपत्या उन्हात राबल्याने सगळ्यांवरच अंथरुणे धरण्याची वेळ आली. तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या औषधोपचारातच पुंजी संपण्याची भीती राकेशकुमारला सतावते आहे.राजस्थानच्या नागौरमधील हनुमंत जाट फरशीची कामे करतो. त्याच्यासह पस्तीस मजूर सांगलीत अडकलेत. मार्चमध्ये बांधकामे सुरू असल्याने निवारा केंद्रांची गरज भासली नाही. आता काम संपल्याने अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली