शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

CoronaVirus Lockdown : स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:37 IST

सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

ठळक मुद्दे स्थलांतरितांची अवस्था ना घरका ना घाटका..!अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा

सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शेतीमध्ये हजारो परप्रांतीयांनी घाम गाळला. पाच-दहा वर्षांत सांगलीच्या मातीशी एकरूप झाले. कोरोनाने नाकेबंदी केली आणि अवघ्या दीड महिन्यातच त्यांचा धीर सुटला. गावाच्या मातीचे वेध लागले. रस्ते आणि वाहतूक बंद असल्याने सैरभैर झाले.

किमान पन्नास हजार स्थलांतरित लॉकडाऊन उठण्याची व रस्ते सुरू होण्याची डोळ्यात पाणी आणून वाट पाहत आहेत. हे सर्वजण बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ व कर्नाटकातील आहेत. पैसे, रोजगार किंवा अन्य कोणतेही आमिष रोखू शकत नसल्याचे त्यांच्याशी संवादानंतर स्पष्ट झाले.औद्योगिक वसाहतीतून वीस हजार परप्रांतीय परतण्याच्या तयारीत आहेत. द्राक्षबागा, डाळिंब शेती व बांधकाम क्षेत्रातही वीस हजारहून अधिक स्थलांतरित वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना थांबविण्यासाठी मालकवर्गाचा आटापिटा सुरू आहे. विश्रामबागमध्ये एका बांधकामावर अडकलेल्या पन्नासभर मजुरांची अस्वस्थता सर्व स्थलांतरितांसाठी प्रातिनिधिक ठरावी.उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील दौलतीया गावचे मजूर वर्षभरापासून बांधकामावर आहेत. बांधकाम संपतानाच लॉकडाऊन सुरु झाले. सगळेच अडकून पडले. पत्र्याच्या शेडमध्ये ते दिवस कंठताहेत. सर्वेशकुमार आणि सीमादेवी दांपत्य चार कच्च्याबच्च्यांसह गावी परतण्यासाठी आतुर झालेत. सर्वेशकुमार सेंट्रिंग करतो. काम संपल्याने पगार थांबलाय. जमविलेली पुंजी दीड महिन्यात खर्ची पडली. गावाकडे जाण्यापुरते पैसे ठेवलेत. मालकाने थोडी मदत दिली; पण सहाजणांच्या कुटुंबाला ती कितीशी पुरणार?कानपूरचा राकेशकुमार आठ-दहा मजुरांसोबत आला आहे. मार्चमध्ये काम संपले. लॉकडाऊनमध्ये बसून राहण्याऐवजी जादा कामे अंगावर घेतली. तळपत्या उन्हात राबल्याने सगळ्यांवरच अंथरुणे धरण्याची वेळ आली. तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या औषधोपचारातच पुंजी संपण्याची भीती राकेशकुमारला सतावते आहे.राजस्थानच्या नागौरमधील हनुमंत जाट फरशीची कामे करतो. त्याच्यासह पस्तीस मजूर सांगलीत अडकलेत. मार्चमध्ये बांधकामे सुरू असल्याने निवारा केंद्रांची गरज भासली नाही. आता काम संपल्याने अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली